Skip to main content

Posts

Showing posts from October, 2025

खारघरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाची सुरुवात विजयादशमी सोहळ्याने

  खारघर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) शताब्दी वर्षाची सुरुवात खारघर येथे विजयादशमी सोहळ्याने झाली. या कार्यक्रमाला २११ गणवेशधारी स्वयंसेवक आणि एकूण ८५५ नागरिक उपस्थित होते. डॉ. सोमाणी प्रमुख पाहुणे होते आणि श्री. विजय वेदपाठक प्रमुख वक्ते होते.       हिंदू समाजात विजयादशमीचे अनंत महत्त्व आहे, कारण ती शक्ती आणि पौरुषत्वाच्या जागरणाचे प्रतीक आहे. विजयादशमी उत्सव हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परंपरेचा एक अविभाज्य भाग आहे, जो शिस्त, एकता आणि सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक आहे. यावर्षी, त्याच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभासह, स्वयंसेवकांसाठी आणि संपूर्ण हिंदू समुदायासाठी या उत्सवाचे विशेष महत्त्व आहे.        प्रत्येक विजयादशमी उत्सवाप्रमाणे, या वर्षीच्या कार्यक्रमात शस्त्रपूजन, मुख्य भाषण आणि विशेष पाहुण्यांचे भाषण असे विविध कार्यक्रम होते. स्वयंसेवक पूर्ण गणवेशात उपस्थित होते आणि समुदायातील उच्चभ्रूंनीही उत्साहाने सहभाग घेतला .      महोत्सवाविषयी माहिती देताना शहर प्रभारी म्हणाले, "खारघर हे कुलाबा जि...

सीकेटी महाविद्यालयात 'बौद्धिक संपदा हक्क' विषयावर मार्गदर्शन .... ४१ पेटंट धारकांचा गौरव...

  पनवेल(प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स (IPR) अर्थात बौद्धिक संपदा हक्क या विषयावरील मार्गदर्शन सत्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि बौद्धिक संपदा हक्क विभागाच्या संयुक्त उपक्रमातून हे मार्गदर्शन सत्र घेण्यात आले. बेंगळुरूच्या जी. इ. एच. रिसर्च या संस्थेचे संस्थापक डॉ. बी. के. सरकार आणि महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, मुंबईचे इन चार्ज लायब्रेरियन डॉ. बी. के. मोरे यांच्या सारख्या मान्यवरांचे मार्गदर्शन यानिमित्ताने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एस. के. पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत केले, तसेच नवप्रवर्तन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव केला. महाविद्यालयातील बौद्धिक संपदा हक्क विभागाच्या सदस्य सचिव डॉ. ज्योत्स्ना ठाकूर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. या मार्गदर्शन सत्रात डॉ. सरकार यांनी विद्यार्थ्यांना आयपीआर फाईलिंग, पेटंटचे व्यवसायीकरण आणि संबंधित योजना याबाबत प्रेरणादायी शब्दात मा...

सहायक पोलीस आयुक्त, खारघर विभाग, नवी मुंबई कार्यालयाचे उद्घाटन

  पनवेल, दि.3 (संजय कदम) ः सहाय्यक पोलीस आयुक्त, खारघर विभाग, नवी मुंबई कार्यालयाचे उद्घाटन आज दि.3 ऑक्टोबर रोजी पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांच्या हस्ते करण्यात आले. नवी मुंबई पोलीस आयुक्तालया अंतर्गत महाराष्ट्र राज्य, शासन निर्णय क्रमांक एपीओ/3525/प्र.क्र.58/पोल-3. दिनांक 23/07/2025 अन्वये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 1 व 2 यांची पुनर्रचना करुन पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 1 वाशी, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 2 बेलापूर व पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 3 पनवेल असे तीन परिमंडळ निर्माण करण्यात आलेले आहेत. तसेच सदर परिमंडळ 3 मध्ये सहायक पोलीस आयुक्त, खारघर विभाग हे पद नव्याने निर्माण करण्यात आलेले आहे. खारघर विभागाअंतर्गत खारघर, कामोठे, कळंबोली व तळोजा अशी 4 पोलीस स्टेशनची हद्द निश्‍चित करण्यात आलेली आहे. खारघर विभागाचा कार्यभार श्री. विक्रम कदम, सहायक पोलीस आयुक्त यांनी दिनांक 01/08/2025 रोजी स्विकारला आहे. सहायक पोलीस आयुक्त, खारघर विभाग यांचे कार्यालय हे खारघर पोलीस स्टेशनच्या पहिला मजल्यावर कार्यान्वीत करण्यात आलेले आहे. सदर कार्यालयाचे उद्घाटन मिलिंद भारंबे, पोलीस आयुक...

लोकनेते स्व. दि बा पाटील यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिले जाणार; माननीय मुख्यमंत्री महोदयांचा स्पष्ट निर्वाळा!

  मुंबई/प्रतिनिधी दि.३ : लोकनेते स्व. दि बा पाटील साहेबांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देणे, हा केवळ औपचारिकेचा विषय राहिला आहे. भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्तांच्या मागणीला कोणाचाही विरोध नसून, या नामकरणासाठी दुसरा कोणताही पर्याय शासनाकडे नाही, त्यामुळे आता विमानतळाचे नाव जाहिर होणे ही केवळ औपचारिकता राहिलेली आहे.८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी हे नामकरण होईल, याकरिता प्रयत्न केला जात असून, उद्घाटनानंतर किमान ४५ दिवसांचा कालावधी विमानतळ कार्यरत होण्यासाठी लागतो, अशावेळी या विमानतळाचे नामकरण हे नवी मुंबई विमानतळाचा नाम विस्तार आहे, त्यानंतर ‘लोकनेते दि बा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असेच नामकरण होणार आहे.यासंदर्भात आमच्याकडून एकाच नावाचा प्रस्ताव गेलेला असून, आदरणीय पंतप्रधानांची मागील आठवड्यात भेट घेतली असता, त्यांनी सुद्धा राज्य सरकार जे नाव पाठवेल, तेच नाव अंतिम होईल, असा निर्वाळा दिल्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर बैठकीत सांगितले. यामुळे आमच्या मनात देखील लोकनेते दि बा पाटील यांचेच नाव द्यायचे आहे, हा विश्वास ठेवावा. नवी मुंबई विमानतळाप्रम...

पूरग्रस्त भागातील लहान मुलांसाठी दसऱ्याचे सोने रूपी शालेय साहित्य वितरण;"प्रितम म्हात्रेंच्या नेतृत्वाखाली एकवटले पनवेल–उरण आणि खालापूरकर"

  पनवेल : महापुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी झाली , त्यांच्या आशा-स्वप्नं महापुरात वाहून गेले , तरीही शेतकरी थांबला नाही; तो पुन्हा शून्यातून नव्याने उभा राहतोय. अशावेळी त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी शक्य असेल ते सर्व सहकार्य करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन भाजप नेते आणि जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी केले होते. याप्रसंगी, त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि पनवेल, उरण व खालापूरमधील नागरिक तसेच विविध सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य जमा करून त्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावण्याचा पुढाकार घेण्यात आला.        पनवेल उरण आणि खालापूर मधील विविध संस्थांनी व नागरिकांनी लहान मुलांसाठी दप्तर, वह्या, पेन्सिल, पेन, खोडरबर, शार्पनर, पट्टी यांसारखे शालेय साहित्य जमा केले. हे सर्व साहित्य दसऱ्याच्याच दिवशी वितरण करून लहान मुलांना दसऱ्याला सोनेरूपी शालेय वस्तूंची भेट द्यावी या श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या विचाराने दा...

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व.लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत चर्चा सफल;पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेने किंजरापू नायडूंना दिले निवेदन

  पत्रकारांच्या धडपडीला लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिला दुजोरा  पनवेल(प्रतिनिधी) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. लोकनेते दिबा पाटील यांचेच नाव कायम व्हावे यासाठी दिबा पाटील यांच्या नावासाठी कृती समितीचे लोकनेते रामशेठ ठाकूर आणि दशरथ पाटील यांच्या नेतृत्वात अनेक आंदोलने केली गेली. मात्र याचवेळी स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या लढ्याला झुगारून देण्याचा प्रयत्न काही बाहेरील मंडळी करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सुरुवातीपासूनच दिबांच्या नावासाठी आग्रही असलेल्या भूमिपुत्र पत्रकारांनी आता एकत्र येत विमानतळाला दिबांचेच नाव लागले पाहिजे यासाठी आग्रही भूमिका घेत स्थानिक पत्रकारांची मागणी देखील केंद्र सरकारने लक्षात घेतली पाहिजे, यासाठी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेचे पदाधिकारी हे दिल्ली येथे जाऊन त्यांनी केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्री किंजरापू नायडू यांना निवेदन दिले. त्याचबरोबर विरोधी पक्षाच्या अर्थात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेसचे राहुल गांधी यांना देखील निवेदन दिले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिबांच्या नावासाठी केलेला संघर्ष समोर आणताना मुंबई मर...