Skip to main content

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व.लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत चर्चा सफल;पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेने किंजरापू नायडूंना दिले निवेदन

 


पत्रकारांच्या धडपडीला लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिला दुजोरा 


पनवेल(प्रतिनिधी) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. लोकनेते दिबा पाटील यांचेच नाव कायम व्हावे यासाठी दिबा पाटील यांच्या नावासाठी कृती समितीचे लोकनेते रामशेठ ठाकूर आणि दशरथ पाटील यांच्या नेतृत्वात अनेक आंदोलने केली गेली. मात्र याचवेळी स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या लढ्याला झुगारून देण्याचा प्रयत्न काही बाहेरील मंडळी करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सुरुवातीपासूनच दिबांच्या नावासाठी आग्रही असलेल्या भूमिपुत्र पत्रकारांनी आता एकत्र येत विमानतळाला दिबांचेच नाव लागले पाहिजे यासाठी आग्रही भूमिका घेत स्थानिक पत्रकारांची मागणी देखील केंद्र सरकारने लक्षात घेतली पाहिजे, यासाठी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेचे पदाधिकारी हे दिल्ली येथे जाऊन त्यांनी केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्री किंजरापू नायडू यांना निवेदन दिले. त्याचबरोबर विरोधी पक्षाच्या अर्थात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेसचे राहुल गांधी यांना देखील निवेदन दिले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिबांच्या नावासाठी केलेला संघर्ष समोर आणताना मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पनवेलमधील पत्रकारांच्या एकत्रीकरणाचा मुद्दा मांडला, त्या मुद्द्यामुळे पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे विशेष आभार मानले.


नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली संघटना स्थापन करण्यात आली. त्यानंतर त्या संघटनेचे अध्यक्ष दशरथदादा पाटील यांनी नेतृत्व स्विकारले. या दरम्यान अनेक आंदोलने, अनेक बैठका पार पडल्या. अनेक पक्षांच्या माध्यमातून आवाज देखील उठविण्यात आला. मधल्या काळात सरकार देखील बदलले आणि बदलून डबल सत्तेवर आले. यावेळी लोकनेते दिबा पाटील यांचे नाव विमानतळाला मिळावे म्हणून, पत्रकारही आपले अस्तित्व सांभाळून प्रसिद्धी देण्याचे काम करीत राहिले. मात्र स्थानिक प्रश्न हाताळणाऱ्या संघटनांना मदत करणाऱ्या पत्रकारांना देखील आता रस्त्यावर उतरावे लागले आहे. 


पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्यावतीने सुरुवातीला सिडको प्रशासनाकडे पत्र व्यवहार करून धरणे आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला आणि तसे निवेदन सिडको प्रशासनाला दिल्यानंतर सिडकोने सकारात्मक प्रतिसाद देत धरणे आंदोलन स्थगित केले. यानंतर पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन विमानतळाला दिबांचे नाव देण्याबाबत निवेदन सादर केले. यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी देखील विमानतळाला दिबांचेच नाव लागणार असल्याचे आश्वासित केले. असे असतानाही विमानतळाला दिबांचे नाव लागलेच पाहिजे या हट्टासाठी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेचे पदाधिकारी दिल्ली येथे केंद्रीय नागरी विमानन व हवाई उड्डाण मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांना निवेदन देण्यासाठी आले असता, नायडू यांच्या कार्यालयाकडून देखील नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. लोकनेते दि. बा. पाटील यांचे देण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले. 


दरम्यान पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेचे पदाधिकारी दिल्ली येथे आले असताना, रायगड जिल्ह्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत पनवेलच्या या एकत्रीकरण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय आणि दिबांच्या नावासाठी सुरु केलेल्या लढ्याची दखल घेत प्रशंसा केली. त्यामुळे पत्रकारांचे मनोबल देखील वाढले असल्याचे संस्थेच्यावतीने सांगण्यात आले. यावेळी दिल्ली येथे केंद्रीय नागरी विमानन व हवाई उड्डाण मंत्री किंजरापू राममोहन नायडू, विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसचे राहुल गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना देखील संस्थेच्यावतीने निवेदने देण्यात आली आहेत. यावेळी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेचे जेष्ठ पत्रकार विजय कडू, विवेक पाटील, संजय कदम, निलेश सोनावणे, केवल महाडिक, राज भंडारी, प्रकाश म्हात्रे, विशाल रावसाहेब सावंत, गणपत वारगडा, शंकर वायदंडे, आदींचे शिष्टमंडळ उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

पराभूत झाले तरी संपूर्ण ताकदीने लढले

  पनवेल : पनवेल 188 विधानसभेत शेकाप आघाडीची 2019 मध्ये 87000+ मते असताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेलमध्ये मुसंडी मारून महाविकास आघाडी,शेकाप आणि मित्र पक्षांच्या मदतीने शेतकरी कामगार पक्षाचा 1 लाख 32 हजार 840 चा आकडा पार केला.           बाळाराम पाटील यांच्या विरोधात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या सभा घेतल्या. तसेच स्टार प्रचारक प्रचारात उतरवले याविरुद्ध दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कोणताही मोठा नेता किंवा स्टार प्रचारक नसताना महाविकास आघाडी, शेकाप नेत्यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली माजी आमदार बाळाराम पाटील हे प्रचंड ताकतीने लढले आणि त्यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात एक लाख बत्तीस हजार 840 मते मिळवली. त्यामुळे महाविकास आघाडी शेकापची मते पनवेल विधानसभा मतदारसंघात वाढली आहेत. १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही पनवेल मधील काळसेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी सुरू झाली. ८ वाजता टपाल मतदानाची सुरवात झाल्यापासून शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील हे आघाडीवर होते. पह...

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)...