Skip to main content

Posts

Showing posts from November, 2025

पनवेल मतदारसंघात महिला सक्षमीकरणाचा मोठा उपक्रम : ४ हजाराहून अधिक महिलांना मिळणार शिलाई व घरघंटी मशीन

  आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी स्वयंरोजगार उपक्रम पनवेल (प्रतिनिधी) पनवेल विधानसभा मतदारसंघातील महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या उद्देशाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेंतर्गत जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत घरघंटी व शिलाई मशीन वाटपाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या ४ हजारहून अधिक पात्र लाभार्थींना सोमवार दिनांक ०१ डिसेंबर २०२५ रोजी पासून शिलाई व घरघंटी मशीनचे वाटप करण्यात येणार आहे. या  कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा खनिकर्म अधिकारी अमर देवेकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत असलेला हा उपक्रम पनवेल मतदारसंघात घरगुती उद्योगांना नवी दिशा प्रदान करणारा ठरणार आहे. महिलांच्या हाती रोजगाराचे साधन दिल्यास त्यांच्या कुटुंबाच्या उन्न...

पनवेल परिसरातील ओपन लॉनवरील विवाह समारंभाला आता पहिली पसंती; हटके लग्न सराई, ठरतेय मुख्य आकर्षक

  पनवेल दि. २८ ( वार्ताहर ) : सध्या लग्नसराईचे दिवस सुरु असून लग्नाचे मुहूर्त जास्त तर हॉलची संख्या कमी झाल्याने आता पनवेल परिसरातील ओपन लॉनवरील विवाह समारंभाला पहिली पसंत सर्वजण देत आहेत .                           लग्नसराईत पूर्वीच्या काळी जेवणाची  पंगत जमिनीवर त्यानंतर खुर्ची टेबलावर आता मात्र बदलत्या युगात त्याची जागा बुफे पद्धतीने घेतली आहे .  लग्न सराईच्या हटके पद्धतीत बुफे पद्धतीला मान देण्यात येत असल्याने ग्रमीण भागात सुद्धा पंगतीच्या जागी बुफे पद्धत जास्त प्रमाणात दिसून येत आहे. त्याच प्रमाणे सभागृहासह ओपन लॉनवर शुभमंगलला पसंती मिळत आहे. त्या जोडीला संगीतमय मंगलाष्टकांची रेलचेल आहे. बाहेरील बाजूस फोटो सेक्शनसाठी विविध आकर्षक सजावट करण्यात येत असून लग्नसमारंभ हा इन्हेंट ठरत आहे. पूर्वी तुलसी विवाहनंतर खऱ्या अर्थाने  लग्न सराईला  सुरुवात होत असे व त्यानंतर  बाजारपेठांमध्ये लग्रसराईचा साज चढू लागत असे . विवाह समारंभांसाठी लागण...

ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांचा विशेष सत्कार...

  पनवेल दि .१५ (वार्ताहर) : महाराष्ट्र शासनातर्फे वंदे मातरम गीताच्या १५० व्या वर्धापन दिन समितीवर शासकीय तालुकास्तरीय समितीवर निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांचा मा. रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.  श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल, पनवेल शाखा आयोजित साहित्यिकांचा गौरव सोहळा आणि कविसंमेलन चे आयोजन पनवेल येथे करण्यात आले होते. या सोहळ्यादरम्यान सोहळ्याचे अध्यक्ष मा रामशेठ ठाकूर साहेब,प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर, सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे, ज्येष्ठ गझलकार ए के शेख, नवीन पनवेल शाखा अध्यक्ष गणेश कोळी, पनवेल शाखा अध्यक्ष सुभाष कुडके, ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, माजी उपमहापौर चारुशीला घरत आदींच्या उपस्थितीत व मान्यवरांच्या हस्ते नुकतीच महाराष्ट्र शासनातर्फे वंदे मातरम गीताच्या १५० व्या वर्धापन दिन समितीवर शासकीय तालुकास्तरीय समितीवर निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!

  मुंबई/प्रतिनिधी,दि.१५-राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व महानगरपालिका अशा सर्वच निवडणुका टप्प्याटप्प्याने आता घेतल्या जाणार आहेत. या महत्त्वपूर्ण निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीने राज्यस्तरीय निवडणूक संचालन समिती आता घोषित केली आहे. या महत्त्वपूर्ण महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये आमदार विक्रांत पाटील यांना निवडणूक 'राज्य निवडणूक समन्वयक' ही महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र जी चव्हाण व राज्य निवडणूक प्रभारी व महसूल मंत्री मा.ना.चंद्रशेखर जी बावनकुळे यांनी ही राज्यस्तरीय निवडणूक संचालन समिती घोषित करत अनेक नेते व पदाधिकारी यांना निवडणुकी संदर्भातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत. यापूर्वी आमदार विक्रांत पाटील यांनी अशा अनेक महत्त्वपूर्ण संघटनात्मक आणि निवडणुकीसंदर्भातील जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या असल्याने या आगामी निवडणुकांमध्येही त्यांना ही महत्त्वपूर्ण 'राज्य निवडणूक समन्वयक' ही जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी स्थानिक ...

ज्येष्ठ पत्रकार संजय कदम व आप्पासाहेब मगर यांची वंदे मातरम 150 व्या वर्धापनदिन शासकीय तालुकास्तरिय समितीवर नियुक्ती

  पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः बंकीमचंद्र चट्टोपाध्याय यांनी 1857 साली लिहिलेल्या वंदे मातरम या गीतास स्वातंत्र्य लढयात तसेच स्वातंत्र्योत्तर कालखंडातही अनन्ययाधारण महत्व प्राप्त आहे. आनंदमठ या कादंबरीतील हे गीत भारतमातेच्या स्तृतीचे प्रतीक असून, स्वातंत्र्य लढयातील असंख्य क्रांतीकारकांना प्रेरणादायी ठरलेले आहे. या गीतास दिनांक. 07 नोव्हेंबर, 2025 रोजी 150 वर्ष पूर्ण झाली आहेत.त्यानिमित्ताने शासन निर्णयानुसार, राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये वंदे मातरम गीताच्या 150 व्या वर्धापन दिनाचे यशस्वी आयोजनासाठी अपर तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरिय समिती स्थापन करण्यात येत आहे. यामध्ये पनवेलमधील ज्येष्ठ पत्रकार संजय कदम व खारघर येथील ज्येष्ठ पत्रकार आप्पासाहेब मगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कमिटीमध्ये अप्पर तहसीलदार पनवेल जितेंद्र इंगळे हे अध्यक्ष, गटविकास अधिकारी समीर वाठारकर सदस्य, सहा.आयुक्त कौशल्य विकास मोहसीन वस्ता, प्रतिनिधी, सदस्य गटशिक्षणाधिकारी शाहू सकपाळ, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी पिल्ले सर, महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाचे ...