Skip to main content

Posts

Featured Post

आजही मी शेकापक्षातच ; महाविकास आघाडीतून बाहेर पडलो आहे : मा.नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे

पनवेल : आजही मी शेकापक्षाचा कार्यकर्ता म्हणून पत्रकार परिषद घेतली असून मी माझ्या भूमिकेशी ठाम आहे. परंतु महाविकास आघाडीची भूमिका मला पटत नसल्याने मी त्यातून बाहेर पडत असल्याचे स्पष्ट मत मा.नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे यांनी पनवेल येथील त्यांच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.           गेली 48 वर्षे मी राजकारणात असून शेकापक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे. पक्षाने जी-जी जबाबदारी माझ्या टाकली ती मी प्रामाणिकपणे पार पाडली आहे, असे असतानाही नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत उरण मतदार संघातून माझा मुलगा प्रितम म्हात्रे हा उभा असताना त्याच्या विरोधात महाविकास आघाडीने काम केले अहे. त्यामुळे निसटता पराभव आमचा झाला. याबाबत मी माझी स्पष्ट भूमिका पक्षश्रेष्ठींकडे मांडून आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडू या असे वारंवार सांगितले. परंतु त्यांना आजही महाविकास आघाडीमध्येच रहायचे असल्याने मी या महाविकास आघाडीतून माझ्या कार्यकर्त्यांसह बाहेर पडत आहे. भाई जयंत पाटील यांच्या निवडणुकीत सुद्धा शिवसेनेने त्यांच्या विरोधात उमेदवार दिला. पनवेल मतदार संघातून ब...
Recent posts

स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या पुण्यतिथी निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन

भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची लाभणार प्रमुख उपस्थिती  "स्व. जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा;  चिंध्रण ग्रामपंचायत सर्वोत्कृष्ट  पनवेल(प्रतिनिधी) पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती, कष्टकऱ्यांचे द्रष्ट नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या ३७ व्या पुण्यतिथी निमित्ताने ०७ मे २०२५ रोजी सायंकाळी ०६ वाजता उलवे नोड मध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज (दि. ०३) येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यामध्ये विशेषत्वाने पनवेल तालुकास्तरीय "स्व. जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा २०२५"चे बक्षिस वितरण तसेच शिक्षण, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या गुणिजनांचा पारितोषिक सन्मान समारंभ त्याचबरोबरीने "मराठी पाऊल पडते पुढे" या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.         ...

जनसुरक्षा विधेयकाने नागरिकांच्या हक्काला बाधा येणार नाही- मुख्यमंत्री

  पत्रकार संघटनांच्या आक्षेपांची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल मुंबई, दि. ९ (प्रतिनिधी)- महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकामुळे नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला कोणतीही बाधा येणार नाही असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचात सहभागी राज्यातील प्रमुख पत्रकार संघटनांच्या प्रतिनिधींना दिला . या कायद्यातील तरतुदींवर विविध पत्रकार संघटनांनी घेतलेल्या आक्षेपाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतली.  महाराष्ट्रातील विविध १४ संघटनांनी एकत्रित येत पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंच स्थापन केला होता. या मंचाची आज सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा झाली.  पत्रकार अभिव्यक्ती मंचच्या वतीने एस.एम.देशमुख, संदीप चव्हाण, दिलीप सपाटे, यदु जोशी, विशाल सिंग, पंकज दळवी, इंद्रकुमार जैन, प्रदीप मैत्रा, दीपक भातूसे, श्रीकिशन काळे यांनी या मसुद्यातील विविध मुद्यांवरील पत्रकार संघटनांचे असणारे आक्षेप मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. हा कायदा म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला असल्याचे प्रथमदर्शनी मत समाजाच्या...

आप्पासाहेब मगर यांचा "बेस्ट जर्नालिस्ट नॅशनल एक्सप्रेस राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान"

  पणजी/प्रतिनिधी : खारघर येथील जनसभा या वर्तमानपत्राचे संपादक आणि खारघर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब मगर यांना बाबू जगजीवन राम कला संस्कृती साहित्य अकादमी महाराष्ट्र प्रदेश सचिव व इमेज इंटरनॅशनल रिसर्च असोसिएशन तसेच नॅशनल प्रधान मुख्य सरपंच संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नवव्या राष्ट्रीय युथ इमेज इंटरनॅशनल संमेलनामध्ये "बेस्ट जर्नालिस्ट नॅशनल एक्सप्रेस राष्ट्रीय पुरस्कार" जाहीर करण्यात आला.वैयक्तीक कारणांमुळे पणजी मध्ये पार पडलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्याला आप्पासाहेब मगर हे उपस्थित राहू शकले नाहीत.सोळाव्या लोकसभेचे माजी खासदार डॉक्टर सुनील गायकवाड यांच्या शुभहस्ते 16 फेब्रुवारी 2025 रोजी पणजी येथे या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे प्रदेश सचिव प्राध्यापक गोरख साठे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आप्पासाहेब मगर हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांनी आतापर्यंत समाजातील उपेक्षित,दुर्बल,वंचित घटकांच्या न्याय हक्कासाठी गेले पंधरा वर्षापासून खारघर शहर व नवी मुंबई परिसरात जनसभा या साप्ताहिकाच्या माध्यमातून कार्य केले आहे.लोकशाहीचा चौथा स्तंभ मजबूत ...

पत्रकार संजय कदम यांना सिंधुरत्न पुरस्काराने आले गौरविण्यात

  पनवेल, दि.9 (वार्ताहर) ः सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संस्था, पनवेल या आपल्या संस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलन पनवेल येथील फडके नाट्यगृहात अत्यंत उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. भगवान बिरमोळे हे समारंभाचे अध्यक्ष या नात्याने आणि शेकाप नेते प्रीतम म्हात्रे, शेकाप जिल्हा चिटणिस गणेश कडू, उद्योजक मंगेश परुळेकर, सिंधुदुर्ग येथील अभियंता अजयकुमार सर्वगौड, युवा नेते मंगेश अपराज, आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी पत्रकार संजय कदम यांना सिंधुरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.याप्रसंगी रमाकांत चव्हाण व संजय साटम याना ’जीवन गौरव’ आणि पत्रकार संजय कदम याना ’सिंधुरत्न’ या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. त्याचबरोबर यशस्वी युवा उद्योजक स्थापत्य अभियंता संतोष पोकळे, डॉ.तन्वी बांदेकर, डॉ. आशिष बांदेकर, ऍड. अमोल गावडे आणि क्रीडा क्षेत्रात यश प्राप्त केलेल्या खेळाडूंचाही सत्कार करण्यात आला. सचीव बाप्पा मोचेमाडकर यांनी प्रास्ताविकामधे वर्षभरात आपल्या संस्थेने राबवलेले उपक्रम आणि प्रगतीचा आढावा घेतला. नंतर उपाध्यक्ष प्रिया खोबरेकर व अध्यक्ष केशव राणे यांनी आपले मनोग...

आमदार आपल्या दारी' उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत आणि समाधान

  पनवेल (प्रतिनिधी)तळोजा फेज १ मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार 'आमदार आपल्या दारी' हा उपक्रम रविवारी संपन्न झाला. या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत करत समाधान व्यक्त केले.  या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांनी तळोजा परिसरातील नागरीकांच्या सर्व समस्या जाणून त्यांचे निराकरण करणार असल्याची ग्वाही दिली. येत्या ३ महिन्यांनतर पुन्हा एकदा या सर्व विषयांवर आढावा घेणार तसेच येत्या १ महिन्यांच्या आत या सर्व समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा सुरु करून नागरीकांना विविध सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याचे स्पष्ट केले.  त्याचबरोबरीने नागरीकांच्या सुरक्षेचा प्रश्न भाजपचे पदाधिकारी पुढाकार घेऊन सोडवतील असेही त्यांनी नागरिकांना आश्र्वासित केले.  पनवेल महानगरपालिका आणि शासनाशी संबंधित असलेल्या विविध समस्या जाणून त्यांचे निराकरण करण्यासाठी आमदार आपल्या दारी हा उपक्रम करण्यात आला आहे. त्यानुसार तळोजा परिसरातील नागरीकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तळोजा फेज १ सेक्टर ९ मधील उद्यानामध्ये 'आमदार आपल्या दारी' हा कार्यक्रम झाला. यावेळी नागरिकांनी सुरक्षा, पाणी टंचाई, नदी प्रदुषण, ड...

नमो चषक स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात;लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी घेतला आढावा

  पनवेल (प्रतिनिधी) लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने उलवा नोडमध्ये दिनांक २३ ते २५ जानेवारी पर्यंत होणाऱ्या 'नमो चषक' क्रीडा सांस्कृतिक महोत्सवाची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली असून या संदर्भात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (दि. २०) उलवा नोड येथे नमो चषक स्पर्धास्थळी अंतिम आढावा बैठक पार पडली.               पनवेल आणि उरण भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने 'नमो चषक २०२५' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या संदर्भात आयोजनातील विविध समित्यांची बैठक पार पडली. या बैठकीस उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, टीआयपीएलचे संचालक अमोघ ठाकूर, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, भाजपचे जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, उलवा नोड अध्यक्ष अमर म्हात्रे, विजय घरत, भार्गव ठाकूर, विश्वनाथ कोळी, हेमंत ठाकूर, सागर ठाकूर, कबड्डी प्रशिक्षक सुर्यकांत ठाकूर, क्रीडा प्रशिक्षक विनोद नाईक, विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर, शरीरसौष्ठवपटू दिनेश शेळके, मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हा...