Skip to main content

उलवे येथे कर्मवीर भाऊराव पाटील जयंती व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात



पनवेल (प्रतिनिधी) पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था घडवली आणि त्यांचा आदर्श घेऊन घडलेल्या वासरदारांनी ही संस्था मोठी केली असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बुधवारी उलवे येथे कार्यक्रमात केले तसेच येत्या काळामध्ये सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूल हे नवी मुंबईतील प्रथीतयश स्कूल म्हणून उज्वल यश संपादन करणार असा विश्वास व्यक्त करून कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श घेऊन आपण पुढे मार्गक्रमण करायचे आहे असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.


        उलवे येथील रयत शिक्षण संस्थेच्या सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूल सीबीएससी व मराठी माध्यम विद्यालयाच्यावतीने पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३८ जयंती आणि पारितोषिक वितरण समारंभ बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. हा सोहळा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमाला संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय. टी. देशमुख, जनरल बॉडी सदस्य महेंद्र घरत, प्रमुख वक्ते दिनेश सासवडे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्या ज्योत्स्ना ठाकूर, सीबीएसई विद्यालयाचे चेअरमन परेश ठाकूर, मराठी विद्यालयाचे चेअरमन शरद खारकर, अनंता ठाकूर, स्थानिक स्कुल कमिटी सदस्य निलेश खारकर, कविता खारकर, धीरज ओवाळेकर, राजेश खारकर यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रमुख वक्ते दिनेश सासवडे यांनी कर्मवीर अण्णांच्या जीवनप्रवासाचे वर्णन आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा आदर्श लोकांनी घ्यावा असे प्रतिपादन करत कर्मवीरांचे खरे वारसदार म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे शब्दसुमनांनी कौतुक केले. या सोहळ्यामध्ये दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला. तसेच सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना विविध बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

पराभूत झाले तरी संपूर्ण ताकदीने लढले

  पनवेल : पनवेल 188 विधानसभेत शेकाप आघाडीची 2019 मध्ये 87000+ मते असताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेलमध्ये मुसंडी मारून महाविकास आघाडी,शेकाप आणि मित्र पक्षांच्या मदतीने शेतकरी कामगार पक्षाचा 1 लाख 32 हजार 840 चा आकडा पार केला.           बाळाराम पाटील यांच्या विरोधात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या सभा घेतल्या. तसेच स्टार प्रचारक प्रचारात उतरवले याविरुद्ध दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कोणताही मोठा नेता किंवा स्टार प्रचारक नसताना महाविकास आघाडी, शेकाप नेत्यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली माजी आमदार बाळाराम पाटील हे प्रचंड ताकतीने लढले आणि त्यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात एक लाख बत्तीस हजार 840 मते मिळवली. त्यामुळे महाविकास आघाडी शेकापची मते पनवेल विधानसभा मतदारसंघात वाढली आहेत. १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही पनवेल मधील काळसेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी सुरू झाली. ८ वाजता टपाल मतदानाची सुरवात झाल्यापासून शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील हे आघाडीवर होते. पह...

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)...