Skip to main content

लोकनेते रामशेठ ठाकूर मोखाडा महाविद्यालयाला "सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार" जाहीर; मुंबई विद्यापीठाकडून सन्मान

 


पनवेल (प्रतिनिधी) मुंबई विद्यापीठाने 'सर्वोत्कृष्ट ग्रामीण महाविद्यालय' पुरस्कारासाठी मोखाडा येथील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाची निवड जाहीर केली आहे. उच्च दर्जाचे शिक्षण आणि ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाविद्यालयाला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण सोमवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील ग्रीन टेक्नॉलॉजी ऑडिटोरियम येथे एका विशेष समारंभात होणार आहे. तसे पत्र मुंबई विद्यापीठाचे रजिस्टार डॉ. प्रसाद कारंडे यांनी महाविद्यालयाला दिले आहे. 

     थोर देणगीदार तसेच महाविद्यालयाचे विकास समितीचे प्रमुख व रयत शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मोखाडा महाविद्यालयाच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. या ठिकाणी दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना मिळत आहे, त्या अनुषंगाने या महाविद्यालयाने प्रगती साधली. अत्यंत दुर्गम भागात असलेल्या या परिसरात विद्यार्थ्यांची तसेच शिक्षक आणि पालकांची मोठी गैरसोय होती. सोयीसुविधांपासून वंचित राहावे लागत होते. त्यामुळे प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना अडचण भासत होती. आदिवासीबहूल परिसरात १९८४ साली स्थापन झालेल्या या विद्यालयाला उंच भरारी देण्याचे काम लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मोखाडा विद्यालयाला भेट दिली त्यावेळी त्यांनी येथील परिस्थिती बदलवून येथील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा निश्चय केला. दुर्गम भागातील विद्यार्थी सक्षम झाला पाहिजे हि लोकनेते रामशेठ ठाकूर यांची कायम तळमळ राहिली आहे त्यामुळे त्यांनी ताबडतोब कार्यवाही केली आणि प्रत्यक्षात निश्चय पूर्ण करीत मोखाडा परिसरातील विद्यार्थ्यांसाठी भव्य स्वरूपात महाविद्यालयाची इमारत साकारली. आज या ठिकाणी दुर्गम भागातील वाडी वस्तीतील विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेत आहेत. त्यानुसार उच्च दर्जाचे शिक्षण आणि ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुंबई विद्यापीठाकडून लोकनेते रामशेठ ठाकूर मोखाडा महाविद्यालयाला "सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार" जाहीर झाला आणि हि बाब रयत शिक्षण संस्था व महाविद्यालयासाठी अभिमानास्पद सन्मानाची आहे. 


Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

पराभूत झाले तरी संपूर्ण ताकदीने लढले

  पनवेल : पनवेल 188 विधानसभेत शेकाप आघाडीची 2019 मध्ये 87000+ मते असताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेलमध्ये मुसंडी मारून महाविकास आघाडी,शेकाप आणि मित्र पक्षांच्या मदतीने शेतकरी कामगार पक्षाचा 1 लाख 32 हजार 840 चा आकडा पार केला.           बाळाराम पाटील यांच्या विरोधात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या सभा घेतल्या. तसेच स्टार प्रचारक प्रचारात उतरवले याविरुद्ध दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कोणताही मोठा नेता किंवा स्टार प्रचारक नसताना महाविकास आघाडी, शेकाप नेत्यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली माजी आमदार बाळाराम पाटील हे प्रचंड ताकतीने लढले आणि त्यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात एक लाख बत्तीस हजार 840 मते मिळवली. त्यामुळे महाविकास आघाडी शेकापची मते पनवेल विधानसभा मतदारसंघात वाढली आहेत. १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही पनवेल मधील काळसेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी सुरू झाली. ८ वाजता टपाल मतदानाची सुरवात झाल्यापासून शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील हे आघाडीवर होते. पह...

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)...