Skip to main content

पनवेलचे पत्रकार येणार एका छताखाली

 


पनवेल / प्रतिनिधी : पनवेल तालुक्यात झालेल्या बोगस पत्रकारांचा सुळसुळाट आणि शासकीय, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात पत्रकारिता क्षेत्राबाबत झालेले चुकीचे गैरसमज, यावर उपाययोजना करण्याची इच्छा पनवेल तालुक्यातील अनेक जेष्ठ पत्रकारांसह नवोदित पत्रकारांनी व्यक्त केली. त्यानुसार पनवेल तालुक्यातील पत्रकारांना एकसंघ करण्याच्या दृष्टिकोनातून तालुक्यातील सर्वच पत्रकारांचे एकत्र विचार व उपाययोजना करण्यासाठी तसेच आपल्या सूचना मांडण्यासाठी शुक्रवार दिनांक १९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता शासकीय विश्रामगृह, पनवेल येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात पनवेल तालुक्यातील सर्व पत्रकारांनी आवर्जून उपस्थित दाखवून तालुक्यातील ५० हुन अधिक पत्रकार हे एका छताखाली जमले आणि एक तालुका एकसंघ करण्याच्या दृष्टीने विचारविनिमय करण्यात आला.



चर्चासत्राच्या सुरुवातीलाच दिवंगत पत्रकार किरण बाथम यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच साम टीव्हीचे पत्रकार विकास मिरगणे यांच्यावर मुंबई येथे पोलीस खात्याकडून झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. या चर्चासत्रात जेष्ठ पत्रकार माधवराव पाटील, जेष्ठ पत्रकार विजय कडू, निलेश सोनावणे, संजय कदम, सय्यद अकबर, विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. 




यावेळी लोकनेते दि. बा. पाटील साहेबांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याबाबत केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ तसेच खासदार श्रीरंग बारणे यांच्याशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. आज सुरु असलेल्या पत्रकारितेबाबत पत्रकारांनी चर्चा केली तसेच लवकरच पनवेलचे पत्रकार एका छताखाली यावेत यासाठी एक नवीन नोंदणीकृत संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. 


या चर्चासत्रात जेष्ठ पत्रकार माधव पाटील,विजय कडू, निलेश सोनावणे, सय्यद अकबर, संजय कदम, विवेक पाटील, पत्रकार केवल महाडिक, आप्पासाहेब मगर,राज भंडारी, हरेश साठे, क्षितिज कडू, सुभाष वाघपंजे, शंकर वायदंडे, नितीन जोशी, अनिल कुरघोडे, रवींद्र गायकवाड, दिपक घरत, शैलेश चव्हाण, सुनील पाटील, गणपत वारगडा, लालचंद यादव, गौरव जहांगीरदार, साबीर शेख, आशिष साबळे, सुनील वारगडा, विशाल सावंत, चंद्रकांत शिर्के, राम बोरीले, अण्णासाहेब आहेर, सानिप कलोते, असीम शेख, महिला पत्रकार रुपाली शिंदे, दीपाली पारस्कर आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

पराभूत झाले तरी संपूर्ण ताकदीने लढले

  पनवेल : पनवेल 188 विधानसभेत शेकाप आघाडीची 2019 मध्ये 87000+ मते असताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेलमध्ये मुसंडी मारून महाविकास आघाडी,शेकाप आणि मित्र पक्षांच्या मदतीने शेतकरी कामगार पक्षाचा 1 लाख 32 हजार 840 चा आकडा पार केला.           बाळाराम पाटील यांच्या विरोधात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या सभा घेतल्या. तसेच स्टार प्रचारक प्रचारात उतरवले याविरुद्ध दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कोणताही मोठा नेता किंवा स्टार प्रचारक नसताना महाविकास आघाडी, शेकाप नेत्यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली माजी आमदार बाळाराम पाटील हे प्रचंड ताकतीने लढले आणि त्यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात एक लाख बत्तीस हजार 840 मते मिळवली. त्यामुळे महाविकास आघाडी शेकापची मते पनवेल विधानसभा मतदारसंघात वाढली आहेत. १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही पनवेल मधील काळसेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी सुरू झाली. ८ वाजता टपाल मतदानाची सुरवात झाल्यापासून शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील हे आघाडीवर होते. पह...

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)...