Skip to main content

पनवेलच्या मालमत्ता करावरील शास्ती माफीची अभय योजना लागू झाल्याने पनवेलकरांमध्ये आनंदाचे वातावरण - जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे

 


पनवेल दि. १९ (वार्ताहर) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने गेल्या वर्षाभरापासून पनवेलच्या मालमत्ता करावरील शास्ती माफीची अभय योजना लागू करण्यासाठी पाठपुरावा करत होतो. त्याला अखेर यश येऊन आयुक्त मंगेश चितळे यांनी हि योजना लागू केल्याने पानवेलकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याविषयावर सातत्याने प्रयत्न केले होते व अखेरीस हि योजना मंजूर झाल्याने महायुतीने दिलेले आश्वासन पूर्ती करत असल्याचे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी कळंबोली येथे बिमा कॉम्प्लेक्स याठिकाणी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. 

         या पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, उपजिल्हाप्रमुख परेश पाटील, पनवेल महानगरप्रमुख ऍड प्रथमेश सोमण, तालुकाप्रमुख रुपेश ठोंबरे, कळंबोली शहरप्रमुख तुकाराम सरक, कामोठे शहरप्रमुख सुनील गोवारी, खारघर शहरप्रमुख प्रसाद परब, नवीन पनवेल शहरप्रमुख अतुल मोकल, तळोजा शहरप्रमुख विशाल पवार व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी सांगितले कि, पनवेलच्या मालमत्ता करावरील शास्ती माफीची अभय योजना लागू करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांची दीर्घकाळाची मागणी अखेर मान्य झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील मालमत्ता करावरील लावलेली शास्ती तातडीने अभय योजना लागू करुन रद्द करावी यासाठी खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, पनवेल महानगरप्रमुख ऍड प्रथमेश सोमण व इतर पदाधिकारी व इतर सामाजिक संस्था शासनाकडे पाठपुरावा करत होते. याबाबत मुंबई यथे बैठकसुद्धा झाल्या. या बैठकीमध्ये प्रधानसचिवांनी शास्तीमाफीचा विषय़ आयुक्तांच्या अधिकार क्षेत्रात येत असल्याने त्यांनी याबाबत निर्णय घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार आयुक्तांनी सकारात्मक निर्णय घेत शास्तीमाफी योजना सुरु केली आहे असे त्यांनी सांगितले. असे असले तरी इतरही अनेक प्रश्न करमाफी संदभार्त प्रलंबित आहेत. महायुतीच्या माध्यमातून ते सोडवण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहे असे त्यांनी सांगितले. 

        तर या वेळी बोलताना पनवेल महानगरप्रमुख ऍड प्रथमेश सोमण यांनी सांगितले कि, पनवेल महानगर पालिकेने अखेर शास्ती कर माफी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पनवेल शिवसेनेतर्फे शिवसेना पक्षाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महायुती सरकारचे आम्ही आभार मानत आहोत. शास्ती माफ करण्याचा सर्वप्रथम निर्णय वा घोषणा उपमुख्यमंत्री यांनीच केली होती.मंत्रालयात यासंबंधीच्या बैठकही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने झाल्या आहेत, असेहि सोमण यांनी सांगितले. तर उपजिल्हाप्रमुख परेश पाटील यांनी या योजनेचा ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना फायदा होणार असल्याचे सांगितले.

Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

पराभूत झाले तरी संपूर्ण ताकदीने लढले

  पनवेल : पनवेल 188 विधानसभेत शेकाप आघाडीची 2019 मध्ये 87000+ मते असताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेलमध्ये मुसंडी मारून महाविकास आघाडी,शेकाप आणि मित्र पक्षांच्या मदतीने शेतकरी कामगार पक्षाचा 1 लाख 32 हजार 840 चा आकडा पार केला.           बाळाराम पाटील यांच्या विरोधात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या सभा घेतल्या. तसेच स्टार प्रचारक प्रचारात उतरवले याविरुद्ध दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कोणताही मोठा नेता किंवा स्टार प्रचारक नसताना महाविकास आघाडी, शेकाप नेत्यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली माजी आमदार बाळाराम पाटील हे प्रचंड ताकतीने लढले आणि त्यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात एक लाख बत्तीस हजार 840 मते मिळवली. त्यामुळे महाविकास आघाडी शेकापची मते पनवेल विधानसभा मतदारसंघात वाढली आहेत. १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही पनवेल मधील काळसेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी सुरू झाली. ८ वाजता टपाल मतदानाची सुरवात झाल्यापासून शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील हे आघाडीवर होते. पह...

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)...