Skip to main content

खारघरमध्ये एका रात्रीत नऊ घरफोड्या; गृह खात्याने लक्ष देण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी

 

पनवेल (प्रतिनिधी) चोरी आणि घरफोडीच्या अनुषंगाने लोकांना भयमुक्त करण्याची गरज आहे अन्यथा पोलिसांवरील विश्वास उडेल, त्यासाठी गृह खात्याने लक्ष द्यावे अशी, मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत केली. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात २०२५-२६ गृह विभागाच्या पुरवणी मागणीच्या अनुषंगाने बोलताना खारघर मध्ये एका रात्रीत नऊ घरात झालेल्या चोरीसंदर्भात पोलिसांकडून नागरिकांना होणाऱ्या वागणुकीचा दाखला देत आमदार प्रशांत ठाकूर यांनी चिंता व्यक्त केली.            यावेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हंटले कि, पनवेल परिसरात लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या वाढत्या लोकवस्तीमध्ये कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. विशेषत्वाने खारघर सारखे शहर आहे जे सर्व अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त आहे. मात्र कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने अलिकडे वारंवार चिंताजनक प्रकार त्या ठिकाणी घडत आहेत. एका रात्रीत खारघरमधील वास्तुविहार मधील संस्कृती पाच आणि पारिजात सोसायटीतील चार घरांमध्ये असे एकूण नऊ ठिकाणी घरफोड्या झाल्या आहेत. पोलिसांनी हे सर्व गुन्हे एकत्रितपणे नोंद करून घेतले आहेत.पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर त्या ठिकाणी व्यवस्थित उत्तरे दिली जात नाहीत.  त्यामुळे याचा तपास कशाप्रकारे तपास केला जाणार असा नागरिकांमध्ये संभ्रम आहे. पोलिसांकडून तक्रारदारांना योग्य उत्तर दिली जात नाहीत. मनुष्यबळ कमी आहे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत असे तक्रारदारांना सांगितले जाते. विशेष म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये गुन्हेगार कॅप्चर झाले आहेत. त्यामुळे या गुन्हेगारांच्या शोधासाठी काय केले जात आहे याची माहिती पोलिसांनी तक्रादारांशी समन्वय करून दिले पाहिजे. सुरक्षा रक्षक सर्व ठिकाणी आहेत त्यांच्या बैठका झाल्या पाहिजेत तसेच भीती मुक्ततेसाठी पोलिसांनी नागरिकांना आश्वस्थ केले पाहिजे, आणि त्यासाठी गृह विभागाने लक्ष द्यावे, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहात बोलताना मागणी केली. 

चौकट - 
खारघर शहरात एकाच रात्री ९ ठिकाणी घरे फोडून चोरटयांनी लाखोंचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली आहे.खारघर वास्तूविहार सेक्टर १६ येथील संस्कृती को.ऑप. हौ. सोसायटी या ठिकाणी बंद असणार्‍या ५ घरामध्ये घरफोडय़ा झाल्या तसेच पारिजात को. ऑप हौ.सोसायटी या ठिकाणी ४ घरांमध्ये दि.३ रोजी मध्यरात्री ३ च्या सुमारास या घरफोड्या करण्यात आल्या आहेत. घरफोडी करण्यात आलेले बहुतांशी घरे बंद होती.विशेष म्हणजे चोरटयांचा याठिकाणी सर्रास वावर दिसत असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.या परिसरात वारंवार घरफोड्या होत असताना पोलीस करतात काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

पराभूत झाले तरी संपूर्ण ताकदीने लढले

  पनवेल : पनवेल 188 विधानसभेत शेकाप आघाडीची 2019 मध्ये 87000+ मते असताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेलमध्ये मुसंडी मारून महाविकास आघाडी,शेकाप आणि मित्र पक्षांच्या मदतीने शेतकरी कामगार पक्षाचा 1 लाख 32 हजार 840 चा आकडा पार केला.           बाळाराम पाटील यांच्या विरोधात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या सभा घेतल्या. तसेच स्टार प्रचारक प्रचारात उतरवले याविरुद्ध दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कोणताही मोठा नेता किंवा स्टार प्रचारक नसताना महाविकास आघाडी, शेकाप नेत्यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली माजी आमदार बाळाराम पाटील हे प्रचंड ताकतीने लढले आणि त्यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात एक लाख बत्तीस हजार 840 मते मिळवली. त्यामुळे महाविकास आघाडी शेकापची मते पनवेल विधानसभा मतदारसंघात वाढली आहेत. १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही पनवेल मधील काळसेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी सुरू झाली. ८ वाजता टपाल मतदानाची सुरवात झाल्यापासून शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील हे आघाडीवर होते. पह...

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)...