Skip to main content

धर्माच्या नावाखाली कोणतीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही

 


खारघर/प्रतिनिधी,दि.२१- धर्माच्या नावाखाली कोणतीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, कायदा व सुव्यवस्था पाळलीच पाहिजे, असे ठाम मत भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोमवारी पनवेल दौऱ्यादरम्यान व्यक्त केले. अनधिकृत भोंग्यांमुळे वाढणाऱ्या ध्वनीप्रदूषणावर आणि नागरिकांच्या नाराजीवर त्यांनी चिंता व्यक्त करत प्रशासनाने या संदर्भात ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली. महाराष्ट्र भोंगा मुक्त मोहिमेला गती देण्यासाठी किरीट सोमय्या यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत पनवेलचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी खारघर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे, कळंबोली पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते आणि तळोजा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांची भेट घेत शहरातील अनधिकृत भोंगे हटवण्याची मागणी केली. किरीट सोमय्या यांच्या मागणीला पोलिसांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, येत्या आठ दिवसांत कारवाई करून अनधिकृत भोंगे बंद करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी भाजपचे जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, पनवेल उत्तर मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर, माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, नरेश ठाकुर, माजी नगरसेविका नेत्रा पाटील, बबन मुकादम, गुरुनाथ गायकर, कळंबोली शहर मंडळाचे माजी अध्यक्ष रविनाथ पाटील, खारघर महिला मोर्चा अध्यक्षा साधना पवार, मंडल सरचिटणीस दीपक शिंदे, मंडल उपाध्याक्ष किरण पाटील, निर्दोष केणी, अमर उपाध्याय, वासुदेव पाटील, कीर्ति नवघरे, शैलेंद्र त्रिपाठी, युवा मोर्चा अध्यक्ष नितेश पाटील,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड, एस. एस. गांगुर्डे, कार्यकारी अभियंता संदीप चव्हाण, उप विभाग अधिकारी मिलिंद चव्हाण, सहाय्यक अभियंता प्रज्ञा पाटील आदी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

पराभूत झाले तरी संपूर्ण ताकदीने लढले

  पनवेल : पनवेल 188 विधानसभेत शेकाप आघाडीची 2019 मध्ये 87000+ मते असताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेलमध्ये मुसंडी मारून महाविकास आघाडी,शेकाप आणि मित्र पक्षांच्या मदतीने शेतकरी कामगार पक्षाचा 1 लाख 32 हजार 840 चा आकडा पार केला.           बाळाराम पाटील यांच्या विरोधात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या सभा घेतल्या. तसेच स्टार प्रचारक प्रचारात उतरवले याविरुद्ध दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कोणताही मोठा नेता किंवा स्टार प्रचारक नसताना महाविकास आघाडी, शेकाप नेत्यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली माजी आमदार बाळाराम पाटील हे प्रचंड ताकतीने लढले आणि त्यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात एक लाख बत्तीस हजार 840 मते मिळवली. त्यामुळे महाविकास आघाडी शेकापची मते पनवेल विधानसभा मतदारसंघात वाढली आहेत. १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही पनवेल मधील काळसेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी सुरू झाली. ८ वाजता टपाल मतदानाची सुरवात झाल्यापासून शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील हे आघाडीवर होते. पह...

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)...