Skip to main content

भाजपची कोकण विभागीय आढावा बैठक संपन्न

 


पनवेल (प्रतिनिधी) गेल्या ११ वर्षांतील मोदी सरकारच्या कार्यकाळात भारताने विकास, आत्मनिर्भरता आणि जागतिक नेतृत्वाच्या दिशेने भक्कम पावले टाकली आहेत. 'संकल्प से सिद्धि तक' या प्रेरणादायी संकल्पनेवर आधारित, केंद्र सरकारच्या यशस्वी कामगिरीचा लेखाजोखा महाराष्ट्रातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प भाजपा महाराष्ट्र प्रदेशने हाती घेतला आहे. या अभियानाच्या अनुषंगाने ठाणे-कोकण विभागीय आढावा बैठक प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत खांदा कॉलनी मधील सीकेटी महाविद्यालयात संपन्न झाली. या बैठकीत कोकणातील संघटनात्मक बांधणी, बूथ पातळीवरील व्यवस्थापन तसेच लोकांपर्यंत प्रभावीपणे संवाद साधण्याच्या रणनीतीवर सखोल चर्चा झाली.


 कमळ हे केवळ चिन्ह नसून, भाजपाच्या विचारसरणीचे प्रतीक आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या वेशात कमळ परिधान करून अभिमानाने भाजपा प्रतिनिधित्व करावे. आणि मोदी सरकारच्या विकासकार्यांचा घरोघरी प्रचार करणे ही काळाची गरज आहे आणि हे कार्य प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतःचे दायित्व समजून पार पाडावे अशा सूचना उपस्थितांना करण्यात आली. हे अभियान म्हणजे केवळ माहितीप्रसार नव्हे, तर एक जनतेशी भावनिक नातं निर्माण करण्याचा संकल्प आहे ज्यातून २०२४ नंतरची नवी भारतनिर्मिती अधिक भक्कम होणार आहे, असेही रवींद्र चव्हाण यांनी म्हंटले. 


या बैठकीला खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, कोकण विभागीय संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, भाजपचे जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत, सरचिटणीस दिपक बेहरे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी पाटील, खोपोली शहर मंडळ अध्यक्ष राहूल जाधव, खालापूर पूर्व मंडल अध्यक्ष सनी यादव, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अतुल बडगुजर, विकास खुरपूडे, चंद्रप्पा अनिवार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. दरम्यान कार्यक्रमावेळी खोपोली नगरपालिका क्षेत्रातील उद्योजक यशवंत साबळे, सुहास वझरकर, मंगेश सुर्वे, युवा उद्योजक विक्रम साबळे, अजिंक्य तावडे, माजी नगरसेवक अविनाश तावडे, गगणगिरी मित्र मंडळ अध्यक्ष महेंद्र खोत, सामाजिक कार्यकर्ते दिलीप देशमुख, सामाजिक कार्यकर्ते भिमा मोरे, ईरशाद खान, चिराग रावळ, अतूल पवार यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहिर पक्ष प्रवेश केला. त्यांचे भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी सर्व प्रवेश कर्त्यांचे पक्षात स्वागत केले.

Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

पराभूत झाले तरी संपूर्ण ताकदीने लढले

  पनवेल : पनवेल 188 विधानसभेत शेकाप आघाडीची 2019 मध्ये 87000+ मते असताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेलमध्ये मुसंडी मारून महाविकास आघाडी,शेकाप आणि मित्र पक्षांच्या मदतीने शेतकरी कामगार पक्षाचा 1 लाख 32 हजार 840 चा आकडा पार केला.           बाळाराम पाटील यांच्या विरोधात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या सभा घेतल्या. तसेच स्टार प्रचारक प्रचारात उतरवले याविरुद्ध दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कोणताही मोठा नेता किंवा स्टार प्रचारक नसताना महाविकास आघाडी, शेकाप नेत्यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली माजी आमदार बाळाराम पाटील हे प्रचंड ताकतीने लढले आणि त्यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात एक लाख बत्तीस हजार 840 मते मिळवली. त्यामुळे महाविकास आघाडी शेकापची मते पनवेल विधानसभा मतदारसंघात वाढली आहेत. १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही पनवेल मधील काळसेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी सुरू झाली. ८ वाजता टपाल मतदानाची सुरवात झाल्यापासून शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील हे आघाडीवर होते. पह...

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)...