Skip to main content

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांच्या नावाबाबत राजकारण्यांचे गौडबंगाल काय ?-महेंद्रशेठ घरत



उरण (प्रतिनिधी) -"देवाचे कार्य म्हणजे आपले कार्य, कर्ता करविता तोच आहे, तोच मालक आपल्या यशाचा, आपण तर रिकाम्या हाताने आलोय, रिकाम्या हातानेच जाणार आहोत. देवाच्या कामासाठी कधीही मागेपुढे पाहणार नाही. जावळे, शेलघर ही दोन्ही गावे दिवंगत भगत साहेबांपासून आम्ही एकच समजतो. जावळे गावातील विद्यार्थी १९७०-१९८० पर्यंत शेलघरच्या जिल्हा परिषद शाळेत येत होते. ते सारे आमचे वर्ग मित्र होते. त्यामुळे निश्चित इतर गावांपेक्षा जावळे ग्रामस्थांबाबत जास्त आत्मियता आहे. त्यामुळे जावळे ग्रामस्थांसाठी मी मदत करण्यासाठी सदैव तत्पर असतो. जावळे गावाला मैदान, तलाव, समाज मंदिर आदी नागरी कामांसाठी पाठपुरावा होणे गरजेचे आहे. कोणीही आमदार, खासदार असला तरी ते निवडणुकीपुरते असतात.फक्त मतांसाठी असतात.दि. बा. पाटील यांच्यानंतर प्रकल्पग्रस्तांना आधार राहिलेला नाही, म्हणून त्यांचे कार्यकर्ते म्हणून सदैव प्रयत्नशील असतो. दि. बा. पाटील यांचा संघर्ष जिवंत असेपर्यंत संपला नव्हता, आज विमान उडण्याची वेळ आली तरी त्यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिले जात नाही, हे राजकारण्यांचे काय गौडबंगाल आहे. अद्याप नावाची घोषणा न होणे, हे प्रकल्पग्रस्तांचे दुर्दैव आहे. त्यामुळे मुंबई, दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना परमेश्वर सद्बुद्धी देवो आणि दिबांचे नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागावे अशीच सत्यनारायण पूजेनिमित्त प्रार्थना करतो असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत जावळे येथे म्हणाले.


आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काॅंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत ही खूप मोठी शक्ती आहे. हे फार कमी लोकांना माहिती आहे, जिथे जिथे मंदिर तिथे तिथे त्यांचा खारीचा वाटा आहेच, हे मी अभिमानाने सांगेन. प्रकल्पग्रस्त आणि विमानतळबाधित गावांच्या मंदिरांसाठी एक कोटी रुपयांचा निधी मिळवून देण्यात महेंद्रशेठ घरत यांचा सिंहाचा वाटा आहे. म्हणूनच आज स्थलांतरित गावांची मंदिरे भव्यदिव्य होत आहेत, असे मो. का. मढवी गुरुजी यांनी जावळे येथे म्हणाले.


शेतकरी, कामगार प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दि. बा. पाटील यांच्यानंतर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर असणारे आंतरराष्ट्रीय कामगार नेते रायगड नव्हे तर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. गोरगरीब विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च, वैद्यकीय मदत, गरिबांना घरे, मंदिरे, हरिनाम सप्ताह, पायी दिंडी वा इतर कामांसाठी अनेक जण 'सुखकर्ता' मंदिरात येतात. त्यांना सर्व प्रकारची मदत दानशूर नेते महेंद्रशेठ करतात. जावळे गावातील हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार २० वर्षांपूर्वी झाला, त्यावेळीही महेंद्रशेठ यांनी सढळ हस्ते मदत केलीच, शिवाय मंदिर ट्रस्ट रजिस्ट्रेशन सुद्धा स्वखर्चाने केले. मंदिराचे काम अंतिम टप्प्यात असताना काही अडचणी आल्या, त्या सोडवून जावळे हनुमान मंदिराचे काम पूर्ण केले. साहजिकच दिवंगत तुकाराम कडू व ग्रामस्थांनी त्यावेळी महेंद्रशेठ घरत यांचा सत्कार केला होता. आज दुसऱ्या पिढीने पुन्हा एकदा महेंद्रशेठ यांना साकडे घातले, मंदिरात पावसाळ्यात पाणी येतेय, त्यामुळे तत्काळ पाच लाख रुपये खर्च करून महेंद्रशेठ घरत यांनी ते काम पूर्ण केले, असे जावळे ग्रामस्थांनी सांगितले.


यावेळी महेंद्रशेठ घरत यांचा जावळे ग्रामस्थांच्या वतीने मंदिरासाठी सहकार्य केल्याबद्दल यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी कृष्णा कडू, अनंता घरत, रमेश घरत, अण्णा कडू, जगदीश ठाकूर, अरुण घरत आणि मोठ्या प्रमाणात जावळे ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

पराभूत झाले तरी संपूर्ण ताकदीने लढले

  पनवेल : पनवेल 188 विधानसभेत शेकाप आघाडीची 2019 मध्ये 87000+ मते असताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेलमध्ये मुसंडी मारून महाविकास आघाडी,शेकाप आणि मित्र पक्षांच्या मदतीने शेतकरी कामगार पक्षाचा 1 लाख 32 हजार 840 चा आकडा पार केला.           बाळाराम पाटील यांच्या विरोधात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या सभा घेतल्या. तसेच स्टार प्रचारक प्रचारात उतरवले याविरुद्ध दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कोणताही मोठा नेता किंवा स्टार प्रचारक नसताना महाविकास आघाडी, शेकाप नेत्यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली माजी आमदार बाळाराम पाटील हे प्रचंड ताकतीने लढले आणि त्यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात एक लाख बत्तीस हजार 840 मते मिळवली. त्यामुळे महाविकास आघाडी शेकापची मते पनवेल विधानसभा मतदारसंघात वाढली आहेत. १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही पनवेल मधील काळसेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी सुरू झाली. ८ वाजता टपाल मतदानाची सुरवात झाल्यापासून शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील हे आघाडीवर होते. पह...

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)...