Skip to main content

महेंद्रशेठ घरत यांच्याकडे संपूर्ण कोकणाची जबाबदारी सोपवा;जिल्ह्यातील काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठकीत मागणी

 

शेलघर येथे रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न



उरण दि १९(प्रतिनिधी)-"महेंद्रशेठ घरत हे काॅंग्रेसचे निष्ठावंत जिल्हाध्यक्ष आहेत. ते आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगारांचे नेतृत्व करतात. त्यांच्याकडे दातृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व, नेतृत्व हे सर्वच गुण आहेत. साम, दाम, दंड भेद या नीतीचा वापर करण्यात ते वाकबगार आहेत. त्यामुळे कोकणाची संपूर्ण जबाबदारी महेंद्रशेठ घरत यांच्याकडेच द्या," अशी रायगड जिल्ह्यातील काॅंग्रेसच्या सर्वच पदाधिकारी यांनी पनवेल तालुक्यातील शेलघर येथे गुरुवारी (ता. १९) मागणी केली.


"काॅंग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. जे लोक काॅंग्रेसला सोडून गेलेत, ते स्वार्थी होते. रायगडमध्ये नव्याने काॅंग्रेस पक्ष उभा करायचा आहे. त्यासाठी येथील काॅंग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेतल्या जातील. महेंद्रशेठ घरत यांच्यावर लवकरच योग्य जबाबदारी सोपविण्यात येईल," असे काॅंग्रेसचे कोकण विभागाचे प्रभारी यू. बी. व्यंकटेश हे शेलघर येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हणाले. यावेळी अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव, कोकण विभागाचे प्रभारी यू. बी. व्यंकटेश, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तसेच रायगड जिल्ह्याचे निरीक्षक राजेश शर्मा यांनी मार्गदर्शन केले.यावेळी राजेश शर्मा म्हणाले, "गांधीवाद घराघरांत पोहचवा, काॅंग्रेसचे कार्यकर्ते सक्षम आहेत. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक ताकदीने लढण्यासाठी कामाला लागा."


पनवेल तालुक्यातील शेलघर येथील दिवंगत जोमा नारायण घरत समाज मंदिरात रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक गुरुवारी यशस्वीरित्या संपन्न झाली.यावेळी लोकसभेचे विरोधीपक्ष नेते, खासदार राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसा निमित्ताने युवक काँग्रेस तर्फे ५०० रोपांचे वृक्षारोपण मान्यवरांच्या उपस्थितीत केले.


या बैठकीला काँग्रेसचे रायगड जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष, पदाधिकारी, तसेच महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती.जिल्हा प्रभारी राणीराई अग्रवाल, सहप्रभारी श्रीरंग बर्गे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, मार्तंड नाखवा,अकलाख शिलोत्री, महेंद्र ठाकूर, नाना म्हात्रे, जे. डी. जोशी, श्रद्धा ठाकूर, काका ठाकूर, विनोद म्हात्रे,संजय गवळी, भास्कर चव्हाण,वैभव पाटील, किरीट पाटील, चिंतामण मकु, रिचर्ड जॉन निखिल डवले तसेच मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.सदर बैठक खेळीमेळीच्या वातावरणात मोठया उत्साहात संपन्न झाली.

Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

पराभूत झाले तरी संपूर्ण ताकदीने लढले

  पनवेल : पनवेल 188 विधानसभेत शेकाप आघाडीची 2019 मध्ये 87000+ मते असताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेलमध्ये मुसंडी मारून महाविकास आघाडी,शेकाप आणि मित्र पक्षांच्या मदतीने शेतकरी कामगार पक्षाचा 1 लाख 32 हजार 840 चा आकडा पार केला.           बाळाराम पाटील यांच्या विरोधात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या सभा घेतल्या. तसेच स्टार प्रचारक प्रचारात उतरवले याविरुद्ध दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कोणताही मोठा नेता किंवा स्टार प्रचारक नसताना महाविकास आघाडी, शेकाप नेत्यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली माजी आमदार बाळाराम पाटील हे प्रचंड ताकतीने लढले आणि त्यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात एक लाख बत्तीस हजार 840 मते मिळवली. त्यामुळे महाविकास आघाडी शेकापची मते पनवेल विधानसभा मतदारसंघात वाढली आहेत. १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही पनवेल मधील काळसेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी सुरू झाली. ८ वाजता टपाल मतदानाची सुरवात झाल्यापासून शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील हे आघाडीवर होते. पह...

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)...