Skip to main content

लोकनेते रामशेठ ठाकूर हे दानशूरता आणि लोकहिताचे मूर्तिमंत उदाहरण- भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण



पनवेल (हरेश साठे) लोकनेते रामशेठ ठाकूर हे दानशूरता आणि लोकहिताचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. लोकांच्या दुःखात सहभागी होण्याबरोबरच आपल्या वैभवाचा उपयोग त्यांनी समाजकल्याणासाठी केला आहे, असे गौरवोद्गार राज्याचे माजी मंत्री आणि महाराष्ट्र प्रदेश भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी खांदा कॉलनी येथे 'अमृतमयी कीर्तन' महोत्सवात केले. 

        सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, अध्यात्मिक, सांस्कृतिक, वैद्यकीय अशा विविध समाजोपयोगी क्षेत्रात अग्रगण्य आणि दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ०२ जून रोजी ७४ वा वाढदिवस असून ते अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. अमृत महोत्सव वर्षाची सुरुवात संतांच्या वाणीच्या गोडव्याने अर्थात 'अमृतमयी कीर्तन महोत्सव २०२५' ने झाली असून त्यानिमित्त आदरणीय गुरुतुल्य कीर्तनकार महाराजांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.  

        या सोहळ्याला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, दीपक बेहेरे, प्रल्हाद केणी, संजय भगत, अंनतबुवा महाराज पाटील, निलेश महाराज, तसेच आदरणीय गुरुतुल्य कीर्तनकार महाराज, आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी हजारोंच्या संख्येने वारकरी संप्रदायातील मंडळी उपस्थित होती. 

        रवींद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणात पुढे बोलताना सांगितले कि, व्यासपीठ आणि माझ्या समोर बसलेल्या सर्वांना त्यांच्याबद्दल माझ्यापेक्षा नक्कीच अधिक माहिती असेल परंतु अशी फार कमी माणसं असतात की जी माणसं दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होत असतात पैसा बऱ्याच जणांकडे असतो पैसे बरेच जण वेगवेगळ्या मार्गातून कमवत असतात परंतु मला मिळालेले हे जे वैभव आहे या वैभवाचा मी खरा वाटेकरी नाही तर हे मला लोकांचे दुःख दूर कमी करण्यासाठी माझ्याकडे येतंय असा विचार करणारी फार कमी व्यक्ती आहेत. असे सांगून मी पाहिलेले असे दानशूर व्यक्तिमत्व जर कोणत असेल तर ते लोकनेते रामशेठ ठाकूर आहेत आणि हे मला अभिमानाने सांगावसं वाटते. अभिमान यासाठी वाटतो की अशा थोर व्यक्तींचा सहवास आणि या सहवासातून सुद्धा आपल्याला बरंच काहीतरी शिकता आले आहे. खरंतर अशी थोर मंडळी किंवा या मंडळींचा सहवास हा तुम्हा सर्वांना एक वेगळ्या पद्धतीचा एक आदर्श निर्माण करत असतो आणि तुम्हा आम्हाला आणि भावी पुढच्या पिढीला एक आदर्शवत असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे. त्यांनी उचललेलं पाऊल आणि त्या पाऊल पडल्यानंतर त्यांना मिळालेले यश खरंतर कशामुळे मिळतं तर आज वयाच्या ७५ व्या वर्षीही सुद्धा कष्ट करण्याची जिद्द. त्यांनी एकदा ठरवलं की मला हे काम पूर्ण करायचा आहे तर ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांची असणारी जिद्द चिकाटी आणि देण्यात येणारा वेळ आणि कामाचं नियोजन. आणि त्याच बरोबर आपल्या सोबत असणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठ्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन त्या कामाला सिद्धी पर्यंत पोहोचवण्यासाठी रात्रीचा दिवस करतात. एकदा संकल्प केला की त्याला सिद्धीस नेण्याचे काम ते करतात. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये शिक्षक म्हणून सुरुवात केली एखादा शिक्षक म्हणून त्यांनी केलेली सुरुवात आणि आज या रायगड असेल किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या वास्तु ज्याला ज्ञान मंदिर म्हटले जाते या ज्ञानमंदिराच्या निर्माण मध्ये त्यांनी केलेला योगदान हे महत्वपूर्ण असून आज हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये असणारे विद्यार्थी आज उच्च शिक्षण घेत आहेत. दानशूरपणा, सामाजिक तळमळ अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत. त्यामुळे एक फार मोठा वारसा त्यांनी सर्वांना दिलेला आहे आणि हा वारसा जो आहे हा वारसा खऱ्या अर्थाने आपल्या पुढच्या पिढीने पुढे नेणं हे अत्यंत गरजेचे आहे. असेही त्यांनी नमूद केले. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींच्या ३०० व्या जयंतीच्या निमित्ताने सांगतो कि, परक्यांनी आपली असणारी श्रद्धास्थान त्यावेळच्या काळामध्ये भंग करण्याचं काम केले आणि त्यानंतरच्या काळामध्ये राजमाता अहिल्यादेवींनी मंदिरांचे जतन व संवर्धन करण्याचे काम केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनीही रायगडसह जवळपासच्या असणाऱ्या या सर्व जिल्ह्यांमध्ये मंदिरांच्या निर्माणासाठी योगदान दिले आहे, या कीर्तन महोत्सवाच्या निमित्ताने वैष्णवांचा मेळा या ठिकाणी आहे. वारकरी सांप्रदाय आणि परंपरा टिकवून ठेवण्यासाठी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज असते. लोकनेते रामशेठ ठाकूर हे नेहमी या संत मंडळींच्या पाठीशी राहिले आहेत. त्यांच्याकडून विचार आणि आदर्शाचा वारसा मिळाला आहे, त्यामुळे लोकनेते रामशेठ ठाकूर यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हि ईश्वराकडे करतो. 

Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)...

पराभूत झाले तरी संपूर्ण ताकदीने लढले

  पनवेल : पनवेल 188 विधानसभेत शेकाप आघाडीची 2019 मध्ये 87000+ मते असताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेलमध्ये मुसंडी मारून महाविकास आघाडी,शेकाप आणि मित्र पक्षांच्या मदतीने शेतकरी कामगार पक्षाचा 1 लाख 32 हजार 840 चा आकडा पार केला.           बाळाराम पाटील यांच्या विरोधात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या सभा घेतल्या. तसेच स्टार प्रचारक प्रचारात उतरवले याविरुद्ध दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कोणताही मोठा नेता किंवा स्टार प्रचारक नसताना महाविकास आघाडी, शेकाप नेत्यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली माजी आमदार बाळाराम पाटील हे प्रचंड ताकतीने लढले आणि त्यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात एक लाख बत्तीस हजार 840 मते मिळवली. त्यामुळे महाविकास आघाडी शेकापची मते पनवेल विधानसभा मतदारसंघात वाढली आहेत. १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही पनवेल मधील काळसेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी सुरू झाली. ८ वाजता टपाल मतदानाची सुरवात झाल्यापासून शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील हे आघाडीवर होते. पह...