Skip to main content

नवी मुंबईतील सर्वच विभागांत व्यापक लोकसहभातून वृक्षारोपण मोहीम – वृक्षसंवर्धनाचे आवाहन

 

 


   नवी मुंबई : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून 5 जून 2025 रोजी नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात व व्यापक लोकसहभागातून भव्यतम वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली.

            महानगरपालिकेच्या आठही विभाग कार्यालय क्षेत्रात राबविण्यात आलेल्या या वृक्षारोपणाप्रसंगी स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, पर्यावरणप्रेमी नागरिक, शिक्षक, विद्यार्थी, बचत गटांच्या महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्या सक्रिय सहभागातून प्राधान्याने देशी वृक्षांची लागवड करण्यात आली.


            सीबीडी बेलापूर मधील पारसिक हिल येथे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते, सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालव यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरंगी, चिंच, आवळा, जांभूळ, हादगा, बांबू अशा देशी प्रजातीच्या वृक्षांची लागवड करून वृक्षारोपण मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमास आगाखान एजन्सी फोर हॅबिटॅट इंडिया, जन स्मॉल फायनान्स बॅंक, रोटरी क्लब, महिला बचत गट,केबीपी कॉलेज वाशी, एस के कॉलेज खारघर व एस आय इ एस कॉलेज नेरूळ येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

           यानिमित्त घणसोली येथे शेतकरी शिक्षण मंडळ शाळेजवळील मोकळया जागेमध्ये तसेच सेंट्रल पार्क, सेक्टर ३ येथे वृक्षारोपण समारंभ अत्यंत उत्साहात आयोजित करण्यात आला होता. याठिकाणी नानारंगी फुलांनी सजवलेल्या पालखीत वृक्षरोपे ठेवून वृक्षदिंडीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी व नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग घेत वृक्षसंपदेचे रक्षण करण्याची मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली.

            नेरूळ विभागात रायन इंटरनॅशनल सेक्टर १९, नेरुळ येथे रस्त्याच्या कडेला आणि डि.वाय.पाटील स्टेडियमसमोरील हरित पट्ट्यामध्ये, वाशी विभागात छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून सागर विहार सेक्टर ८ कडे जाणाऱ्या सायकल ट्रॅकच्या बाजूला, तुर्भे विभागात नानासाहेब धर्माधिकारी उद्यान, सेक्टर १३ सानपाडा, संत शिरोमणी उद्यान, सेक्टर ७ सानपाडा आणि स्वामी मोहनानंद गिरी उद्यान, सेक्टर ४ सानपाडा येथे देशी वृक्षरोपांची लागवड मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांच्या सहयोगातून करण्यात आली.

             अशाच प्रकारे कोपरखैरणे विभागात सेक्टर 14 येथील निसर्ग उद्यानात, ऐरोली विभागात यशवंतराव चव्हाण उद्यानात, दिघा विभागात साने गुरुजी उद्यान आणि संत निरंकारी भवनसमोरील उद्यानात देशी वृक्षरोपांची लागवड नागरिक आणि विद्यार्थी यांच्या उत्साही सहभागातून करण्यात आले . अशाप्रकारे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध विभागांमध्ये प्रामुख्याने देशी प्रजातीच्या जांभूळ, आंबा, करंज, ताम्हण, कडुनिंब, पेरू, पारिजातक, चाफा, आवळा, फणस, पेरू, लिंब, बकुळ, बहावा, कांचन, अनंत, पिंपळ अशा देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. सर्व ठिकाणच्या वृक्ष लागवडीमध्ये लोकप्रतिनिधी, पर्यावरणप्रेमी नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला, शिक्षक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, समाजसेवक, शिखर फाउंडेशन, नानासाहेब धर्माधिकारी संस्था, इच्छापूर्ती मंडळ कोपरखैरणे आणि धन निरंकारी संस्था अशा विविध समाजसेवी संस्थांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण मोहिमेमध्ये सहभाग घेतला.

            याप्रसंगी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त श्री.सुनील पवार व डॉ.राहुल गेठे, उपायुक्त प्रशासन श्री.शरद पवार, उपायुक्त उद्यान श्री.किसनराव पलांडे, उपायुक्त परिमंडळ-१ श्री.सोमनाथ पोटरे, उपायुक्त परिमंडळ -२ डॉ.कैलास गायकवाड, उपआयुक्त मालमत्ता श्री.भागवत डोईफोडे, उपयुक्त घनकचरा व्यवस्थापन डॉ.अजय गडदे, अतिरिक्त शहर अभियंता श्री.अरविंद शिंदे, एमपीसीबीचे क्षेत्रीय अधिकारी श्री.विशाल मुंढे, कार्यकारी अभियंता श्री.मदन वाघचौडे व श्री,राजेश पवार, उपअभियंता श्री.पंढरीनाथ चवडे, सहाय्यक आयुक्त श्रीम.ऋतुजा गवळी, सहाय्यक उद्यान अधिकारी श्री.भालचंद्र गवळी, उद्यान अधिक्षक श्री विजय कांबळे ,उद्यान अधिक्षक श्री.प्रकाश गिरी, समाजविकास अधिकारी श्री.प्रकाश कांबळे, प्रशासकीय अधिकारी श्रीमती.विणा भोगले, सर्व विभागांचे सहाय्यक आयुक्त तथा वृक्ष अधिकारी, उद्यान सहाय्यक, समाजसेवक, समूह संघटक असे महानगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

            सर्वांच्या एकत्रित सहभागातून महानगरपालिका कार्यक्षेत्रात ठिकठिकाणी आयोजित केलेले हे वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी झाले. त्यासोबतच महानगरपालिकेकडून वृक्षरोपे उपलब्ध करून घेऊन विविध सोसायट्या, शिक्षण संस्था, वेगवेगळ्या क्षेत्रातील स्वयंसेवी संस्था, मंडळे, महिला संस्था- मंडळे यांच्यामार्फतही मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण करण्यासोबतच लावलेल्या वृक्षांचे जतन आणि संवर्धन करणे ही आपली जबाबदारी असल्याचे लक्षात घेत त्यादृष्टीनेही सतर्क राहण्याचे या कार्यक्रमांप्रसंगी सूचित करण्यात आले. 

Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

पराभूत झाले तरी संपूर्ण ताकदीने लढले

  पनवेल : पनवेल 188 विधानसभेत शेकाप आघाडीची 2019 मध्ये 87000+ मते असताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेलमध्ये मुसंडी मारून महाविकास आघाडी,शेकाप आणि मित्र पक्षांच्या मदतीने शेतकरी कामगार पक्षाचा 1 लाख 32 हजार 840 चा आकडा पार केला.           बाळाराम पाटील यांच्या विरोधात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या सभा घेतल्या. तसेच स्टार प्रचारक प्रचारात उतरवले याविरुद्ध दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कोणताही मोठा नेता किंवा स्टार प्रचारक नसताना महाविकास आघाडी, शेकाप नेत्यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली माजी आमदार बाळाराम पाटील हे प्रचंड ताकतीने लढले आणि त्यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात एक लाख बत्तीस हजार 840 मते मिळवली. त्यामुळे महाविकास आघाडी शेकापची मते पनवेल विधानसभा मतदारसंघात वाढली आहेत. १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही पनवेल मधील काळसेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी सुरू झाली. ८ वाजता टपाल मतदानाची सुरवात झाल्यापासून शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील हे आघाडीवर होते. पह...

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)...