Skip to main content

साहित्यिकांचा मी कृतार्थ आहे - लोकनेते रामशेठ ठाकूर

 



कोमसापतर्फे कवी संमेलन, परिसंवाद,सन्मान पुरस्कार, अभिष्टचिंतन सोहळा संपन्न 


पनवेल(प्रतिनिधी) माझ्या आयुष्यात मला साहित्य रूपाने साहित्यिकांनी भरभरून दिले आहे,त्यामुळे खरोखरच मी त्यांचा कृतार्थ आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेच्यावतीने आयोजित केलेल्या लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त 'एक कृतार्थ संध्याकाळ' या साहित्यिक कार्यक्रमात केले. या साहित्यिक कार्यक्रमात कोमसापतर्फे कवी संमेलन, लोकनेते रामशेठ ठाकूर एक बहुआयामी व्यक्तिमत्व परिसंवाद, सन्मान गौरव, अभिष्टचिंतन संपन्न झाला. 

        या साहित्यिक कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यास कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक,कवी,चित्रपट निर्माते,दिग्दर्शक रामदास फुटाणे, आमदार विक्रांत पाटील, माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत, सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर, सुप्रसिद्ध साहित्यिक अरुण म्हात्रे, कोकण मराठी साहित्य परिषदेचे जनसंपर्क प्रमुख रायगडभूषण प्रा‌.एल.बी.पाटील, कोमसाप रायगडचे अध्यक्ष सुधीर शेठ, कोमसाप नवीन शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी उपस्थित होते.

        पुढे बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले कि, पनवेलमध्ये चांगले साहित्यिक आहेत आणि त्यांच्या रूपाने चांगले साहित्य वाचण्यासाठी पनवेलकरांना मिळत आहे.आपल जीवन कशासाठी आहे याची ओळख असणे गरजेचे असते, आणि आपण ज्यांच्याकडून घडत गेलो त्याची जाणीवही तेवढीच महत्वाची असते. आपल्या कडून जेवढे होईल तेवढे सामाजिक कात्य करत रहायचे. असे सांगतानाच मी साहित्यिकांच्या ऋणात राहणे पसंत करत असून आपल्या साहित्यिक उपक्रमांसाठी मी तुमच्यासोबत सदैव असेन असेही त्यांनी अधोरेखित केले. 

कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी, लोकनेते रामशेठ ठाकूर हे साहित्यप्रेमी असून समाजामध्ये त्यांचे खूप मोठे कार्य असल्याचे नमूद केले. त्यांनी आपल्या अमृतमहोत्सवी वर्षात पाऊल टाकल आहे त्यांनी शतायुषी व्हावे अशा शुभेच्छा दिल्या. लोकनेते रामशेठ ठाकूर हे रत्न बहुगुणी, बहुआयामी आहे. साधी रहाणी आणि साधा सरळ माणूस अशा व्यक्तिमत्त्वाचे गोव्याचे माजी मुख्यमंत्री बांदोडकर होऊन गेले, त्याचप्रमाणे रायगडला रामशेठ ठाकूर यांच्या रूपाने साधी राहणी, सरळ पण उच्च विचारसरणीचे व्यक्तिमत्व लाभले आहे. साहित्यिक हे सरस्वती पुत्र आहेत, त्यांना रामशेठ ठाकूर हे मोठा मान देतात असे सांगून लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अमृतमहोत्सवी वर्ष सुरू झाले आहे, माझा अमृतमहोत्सव झाला नाही पण मला इतरांचे अमृतमहोत्सव करायचे होते म्हणून मी आहे असे मधु मंगेश कर्णिक यांनी विनोदाने सांगून साहित्यिक म्हणून एक भूमिका असते. समाज पुरुषाला नमस्कार म्हणजे हा आशीर्वाद असतो.रामशेठ ठाकूर यांच्यावर भावासारख प्रेम कराव,मोठ्या भावाने लहान भावाच्या पाठीवर हात ठेवणे हा आशीर्वादच असतो.कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पाठीमागे आपण सतत उभे असता असे सांगून त्याबद्दल शेवटी मधु मंगेश कर्णिक यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. 

        या सोहळ्यात पनवेलचे नाव उंचावणाऱ्या व्यक्ती,संस्थांना मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.अमृतमहोत्सवी वर्षात रामशेठ ठाकूर यांचे पदार्पण होत असल्याने उपस्थित साहित्यिक, पनवेलकरांच्यावतीने टाळ्यांच्या कडकडात त्यांचे स्वागत करण्यात आले. कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या शिक्षिकांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे औक्षण करून पुष्पवृष्टी केली.भला मोठा पुष्पहार, केक कापून सर्वांच्या उपस्थितीमध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोमसाप नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांनी केले तर सूत्रसंचालन रंजना केणी,दर्शना माळी यांनी केले.कार्यक्रमाची सुरुवात कवी संमेलनाने झाली. कवी संमेलनासाठी सुप्रसिद्ध हास्य कवी अशोक नायगावकर, ज्येष्ठ साहित्यिक अरुण म्हात्रे, कोकण मराठी साहित्य परिषदेचे जनसंपर्क प्रमुख रायगड भूषण प्रा. एल.बी.पाटील, दर्या सागरचे अरुण पेडे, प्राध्यापक आढाव, कोमसाप नवीन शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी, प्रा.चंद्रकांत मढवी, गणेश म्हात्रे, एडवोकेट मनोज म्हात्रे उपस्थित होते. या कवी संमेलनात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पनवेल, रत्नागिरी, मुरबाड येथील सुमारे १०० कवींनी सहभाग घेतला.सहभागी कवींना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. या साहित्यिक कार्यक्रमात लोकनेते रामशेठ ठाकूर एक बहुआयामी व्यक्तिमत्व... या विषयावर आयोजित केलेल्या परिसंवादामध्ये पनवेलमधील सुप्रसिद्ध डॉ.गिरीश गुणे,सुप्रसिद्ध साहित्यिक अरुण म्हात्रे, मुंबई मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष शैलेश शिर्के, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेश ठाकूर यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या विविध क्षेत्रातील पैलूंचा आढावा मांडला. 

Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)...

पराभूत झाले तरी संपूर्ण ताकदीने लढले

  पनवेल : पनवेल 188 विधानसभेत शेकाप आघाडीची 2019 मध्ये 87000+ मते असताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेलमध्ये मुसंडी मारून महाविकास आघाडी,शेकाप आणि मित्र पक्षांच्या मदतीने शेतकरी कामगार पक्षाचा 1 लाख 32 हजार 840 चा आकडा पार केला.           बाळाराम पाटील यांच्या विरोधात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या सभा घेतल्या. तसेच स्टार प्रचारक प्रचारात उतरवले याविरुद्ध दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कोणताही मोठा नेता किंवा स्टार प्रचारक नसताना महाविकास आघाडी, शेकाप नेत्यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली माजी आमदार बाळाराम पाटील हे प्रचंड ताकतीने लढले आणि त्यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात एक लाख बत्तीस हजार 840 मते मिळवली. त्यामुळे महाविकास आघाडी शेकापची मते पनवेल विधानसभा मतदारसंघात वाढली आहेत. १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही पनवेल मधील काळसेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी सुरू झाली. ८ वाजता टपाल मतदानाची सुरवात झाल्यापासून शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील हे आघाडीवर होते. पह...