Skip to main content

लोकशाही भक्कम करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया : आमदार प्रशांत ठाकूर

 


पनवेल,दि.25 : लोकशाही भक्कम करण्यासाठी आपण एकत्र येऊया, लोकशाही जागृत ठेवण्याच्यासाठी आपण सारे मिळून प्रयत्न करत राहूया, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. 

 केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे आणीबाणी कालावधीत लोकशाहीचा लढा व बंदिवास भोगावा लागलेल्या मान्यवरांचा सन्मान या विशेष कार्यक्रमाचे आयोजन आज दिनांक 25 जुन रोजी आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये करण्यातआले यावेळी ते बोलत होते.पुढे ते म्हणाले,आणीबाणीच्या काळात लोकशाही पुर्नप्रस्थापित करण्यासाठी , त्यावेळी जे अन्याय अत्याचार सुरू होते, ते थांबविण्यासाठी ज्यांनी सक्रिय भूमिका बजावली अशा मान्यवरांच्या कर्तृत्वाचा अभिमान पनवेलकरांना आहे. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.

      या कार्यक्रमास महापालिका कार्यक्षेत्रातील आणीबाणी कालावधीत लोकशाहीच्या लढ्यांमध्ये बंदिवास भोगावा लागलेले 7 मान्यवर,आमदार प्रशांत ठाकूर, मनपा आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे ,उपायुक्त सर्वश्री डॉ.वैभव विधाते, प्रसेनजित कारलेकर, रविकिरण घोडके, स्वरूप खारगे, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, लेखा परिक्षक निलेश नलावडे,शहर अभियंता संजय कटेकर, सहाय्यक आयुक्त सर्वश्री श्रीराम पवार, डॉ. रूपाली माने, सुबोध ठाणेकर, माजी नगरसेवक नितीन पाटील, अनिल भगत, गणेश कडू, शिवसेना जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, शहर मंडल अध्यक्ष सुमित झुंजारराव, महापालिका अधिकारी व नागरिक या कार्यक्रमांस उपस्थित होते. 

      या कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे यांनी केले. मनपातर्फे या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची त्यांनी यावेळी माहिती दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपायुक्त डॉ.वैभव विधाते यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैशाली पाटील यांनी केले.या कार्यक्रमात पनवेलकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

चौकट 

आणीबाणी दरम्यान बंदिवास भोगलेल्या श्रीमती सरिता प्रभाकर गांधी या आजारी असल्याकारणाने त्या या कार्यक्रमास उपस्थित राहू शकल्या नाहीत त्यांना महापालिकेच्यावतीने त्यांच्या घरी जाऊन सन्मानीत करण्यात आले.


चौकट

आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात 'आणीबाणी विशेष स्मरण प्रदर्शन' 2 जुलैपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.यामध्ये स्वाक्षरी मोहिम राबविण्यासाठी खास बोर्डची सोय करण्यात आली आहे. या बोर्डवर आलेल्या मान्यवरांनी तसेच महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वाक्षरी केली.


      

Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

पराभूत झाले तरी संपूर्ण ताकदीने लढले

  पनवेल : पनवेल 188 विधानसभेत शेकाप आघाडीची 2019 मध्ये 87000+ मते असताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेलमध्ये मुसंडी मारून महाविकास आघाडी,शेकाप आणि मित्र पक्षांच्या मदतीने शेतकरी कामगार पक्षाचा 1 लाख 32 हजार 840 चा आकडा पार केला.           बाळाराम पाटील यांच्या विरोधात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या सभा घेतल्या. तसेच स्टार प्रचारक प्रचारात उतरवले याविरुद्ध दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कोणताही मोठा नेता किंवा स्टार प्रचारक नसताना महाविकास आघाडी, शेकाप नेत्यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली माजी आमदार बाळाराम पाटील हे प्रचंड ताकतीने लढले आणि त्यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात एक लाख बत्तीस हजार 840 मते मिळवली. त्यामुळे महाविकास आघाडी शेकापची मते पनवेल विधानसभा मतदारसंघात वाढली आहेत. १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही पनवेल मधील काळसेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी सुरू झाली. ८ वाजता टपाल मतदानाची सुरवात झाल्यापासून शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील हे आघाडीवर होते. पह...

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)...