Skip to main content

उलवे नोडमध्ये रयत शिक्षण संस्थेचे सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर मराठी माध्यम विद्यालय-विद्यालयाच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा संपन्न


 रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांची लाभली उपस्थिती 

पनवेल (हरेश साठे) उलवे पुष्पक नोडमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर मराठी माध्यम विद्यालयाची उभारणी करण्यात येत असून, या विद्यालयाच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज (०१ जून )संपन्न झाला. रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर व त्यांची पत्नी शकुंतला ठाकूर यांच्या हस्ते इमारतीचा भूमिपूजन समारंभ पार पडला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, वर्षा प्रशांत ठाकूर, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, अर्चना परेश ठाकूर, अमोघ ठाकूर, आदेश ठाकूर, अपूर्व ठाकूर, आदित्य ठाकूर यांच्यासह ठाकूर कुटुंबीय उपस्थित होते. 



सेक्टर २४ मधील प्लॉट क्रमांक २४० येथे झालेल्या या भूमिपूजन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे माध्यमिक विभागाचे सहसचिव बंडू पवार, जनरल बॉडी सदस्य वाय. टी. देशमुख, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड. मनोज भुजबळ, माजी नगरसेविका दर्शना भोईर, माजी पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यकारिणी सदस्य संजय भगत, विभागीय अध्यक्ष विजय घरत, अमर म्हात्रे, सुधीर ठाकूर, भार्गव ठाकूर, न्हावे सरपंच विजेंद्र पाटील, चंद्रकांत भोईर, स्वप्नील ठाकूर, ज्योत्स्ना ठाकूर, योगिया भगत, अनंता ठाकूर, जयवंत देशमुख, विश्वनाथ कोळी, अरुण घरत, निलेश खारकर, मुख्याध्यापिका मुक्ता खटावकर, विभागीय पीआरओ बाळासाहेब कारंडे, संतोष गुजर, मांडवी गुरुजी, राजेश खारकर, किशोर पाटील, शैलेश भगत, मीनाक्षी पाटील, निकिता खारकर, सपना पाटील, गणेश सोमासे, रुपेश मोहिते, रंजना घरत, रंजना पाटील, जागृती म्हात्रे, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




या प्रसंगी उपस्थितांनी सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांचे अभिष्टचिंतन करत त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सौ. शकुंतला ठाकूर या थोर समाजसुधारक जनार्दन भगत साहेब यांच्या कन्या असून, लोकनेते रामशेठ ठाकूर यांना अर्धांगिनी म्हणून त्यांची सामाजिक कार्यात भक्कम साथ लाभली आहे. सामाजिक बांधिलकीचा वारसा जपत या दाम्पत्याने समाजसेवा हाच जीवनधर्म मानला आहे. तर गोरगरीब व वंचित मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सदैव प्रयत्नशील राहून शिक्षण क्षेत्रात आपले अमूल्य योगदान दिले आहे. त्यांच्या पुढाकाराने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था ही एक उत्कृष्ट शैक्षणिक संस्था बनली आहे. मात्र, त्यांच्या मनात आजही मातृसंस्था रयत शिक्षण संस्थेबद्दल अतूट प्रेम आणि निष्ठा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या विकासासाठी सातत्याने मोलाचे योगदान मिळत आले आहे.सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर मराठी माध्यम विद्यालयाची स्थापना हे रयत शिक्षण संस्थेच्या विस्तारात एक महत्त्वाचे पाऊल आहे. या ठिकाणी सीबीसीई माध्यमाचे विद्यालय आहे परंतु काही कुटुंबातील विद्यार्थ्यांचा कल मराठी माध्यमाकडे असतो त्यामुळे या भागात मराठी माध्यमाच्या शाळेची आवश्यकता होती हे लक्षात घेऊन संस्थेने मराठी माध्यमाचे विदयालय उभारण्याचा निर्णय घेतला. उलवे नोडसारख्या वेगाने विकसित होत असलेल्या भागात गुणवत्तापूर्ण मराठी माध्यम शिक्षणाची गरज लक्षात घेऊन हे विद्यालय उभारण्यात येत आहे. या विद्यालयाच्या स्थापनेमुळे परिसरातील विद्यार्थ्यांना मातृभाषेत शिक्षण घेण्याची उत्तम संधी उपलब्ध होणार आहे. शिक्षणाबरोबरच संस्कार, मूल्यशिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम साधणारे हे विद्यालय असणार आहे. 




कोट- समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती वेळोवेळी पुढे येत असतात. पण समाज बदलायचा असेल, शिक्षणात गुणवत्तेचा पाया घालायचा असेल, तर फक्त काम करणं पुरेसे नसते, त्यामागे दूरदृष्टी, कल्पकता आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची जोड लागते. अशा गुणवत्तेचा संगम म्हणजेच लोकनेते रामशेठ ठाकूर. रामशेठ ठाकूर यांनी समाजहिताचे भान ठेवून, पुढील पिढ्यांच्या भविष्याचा विचार करून आपल्या कार्याला नेहमी व्यापक आणि शाश्वत दिशा दिली. त्यांच्या कार्याची खरी ओळख म्हणजे शिक्षणक्षेत्रात त्यांनी उभारलेले अमूल्य योगदान आहे. रयत शिक्षण संस्था ही त्यांच्या सामाजिक दृष्टीकोनाची आणि शैक्षणिक बांधिलकीची साक्ष देणारी संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक सुविधा, आणि संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले आहेत. शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे, क्रीडा व सांस्कृतिक सुविधा या साऱ्यांचा समावेश असलेल्या शैक्षणिक संकुलांची उभारणी हे त्यांच्या कार्याचं मूर्त स्वरूप आहे. रामशेठ ठाकूर यांचा उद्देश नेहमी स्पष्ट राहिला आहे. त्यामुळे त्यांनी शिक्षणासाठी केवळ इमारती उभारल्या नाहीत, तर मूल्याधिष्ठित शिक्षण देणाऱ्या संस्था घडवल्या. त्यांच्या कार्याने हजारो विद्यार्थी घडले, अनेक कुटुंबांचे जीवनमान उंचावले आणि संपूर्ण समाजात सकारात्मक बदलांची नांदी घडवून आणली. आज रामशेठ ठाकूर यांचे नाव उच्चारले की, एक कणखर नेतृत्व, सामाजिक बांधिलकीची जाण आणि परिवर्तनाची आस असलेला व्यक्तिमत्व डोळ्यांसमोर उभं राहते. त्यांचं कार्य म्हणजेच आजच्या आणि उद्याच्या पिढ्यांसाठी एक प्रेरणास्रोत आहे.- रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे

Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)...

पराभूत झाले तरी संपूर्ण ताकदीने लढले

  पनवेल : पनवेल 188 विधानसभेत शेकाप आघाडीची 2019 मध्ये 87000+ मते असताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेलमध्ये मुसंडी मारून महाविकास आघाडी,शेकाप आणि मित्र पक्षांच्या मदतीने शेतकरी कामगार पक्षाचा 1 लाख 32 हजार 840 चा आकडा पार केला.           बाळाराम पाटील यांच्या विरोधात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या सभा घेतल्या. तसेच स्टार प्रचारक प्रचारात उतरवले याविरुद्ध दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कोणताही मोठा नेता किंवा स्टार प्रचारक नसताना महाविकास आघाडी, शेकाप नेत्यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली माजी आमदार बाळाराम पाटील हे प्रचंड ताकतीने लढले आणि त्यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात एक लाख बत्तीस हजार 840 मते मिळवली. त्यामुळे महाविकास आघाडी शेकापची मते पनवेल विधानसभा मतदारसंघात वाढली आहेत. १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही पनवेल मधील काळसेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी सुरू झाली. ८ वाजता टपाल मतदानाची सुरवात झाल्यापासून शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील हे आघाडीवर होते. पह...