Skip to main content

जो काम करेल तो नक्कीच पुढे जाईल-मा.खासदार रामशेठ ठाकूर

 


"रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रितम जनार्दन म्हात्रे जनसंपर्क कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन" 



      पनवेल : जो काम करेल तो पुढे जाईल आणि काम करणाऱ्याला संधी नक्की मिळते. जे एम म्हात्रे आणि प्रितम म्हात्रे हे समाजकारण करत असून त्यांच्या या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना न्याय मिळेल असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते मा.खासदार लोकनेते श्री.रामशेठ ठाकूर यांनी केले. विश्राळी नाका, गुरु शरणम इमारत, पनवेल येथे भारतीय जनता पार्टी प्रितम जनार्दन म्हात्रे जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार श्री.प्रशांत ठाकूर, आमदार श्री.महेश बालदी, आमदार श्री.विक्रांत पाटील, मा.नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, म्हाडाचे मा. अध्यक्ष श्री.बाळासाहेब पाटील, रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, श्री.अतुल दि.बा.पाटील, मा.सभागृह नेते परेश ठाकूर, माजी उपमहापौर चारुशीला घरत, मा.नगराध्यक्ष श्री.संदीप पाटील, श्री मा.नगरसेवक गणेश कडू यांच्यासोबत सर्व सन्माननीय नगरसेवक , पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

        यापूर्वी रामशेठ ठाकूर आणि जे.एम म्हात्रे ही जोडी लोकं ओळखत होती आता प्रितम म्हात्रे आणि परेश ठाकूर ही जोडी ओळखली जाईल असे मा.खासदार रामशेठ ठाकूर यांनी यावेळी सांगितले. मा.विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी खालापूर, पनवेल, उरण, रायगड ई. ठिकाणाहून कुठूनही नागरिक आले तरी नागरिकांना या कार्यालयात सन्मानाने वागणूक मिळेल. कोणाची अडकलेले कामे असतील तर ती नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करणार असल्याचे सांगितले.

         जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी अनेकांची उपस्थिती पाहून ही नक्कीच मोठ्या यशाची नांदी आहे . आगामी महापालिकेच्या निवडणुकीत 78 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी सांगितले. यावेळी जनसेवा करण्यासाठी हे कार्यालय सुरू करण्यात आले असल्याचे माजी नगरसेवक गणेश कडू यांनी सांगितले. 

        आमदार श्री.विक्रांत पाटील यांनी आपल्या पाठीशी मजबुतीने उभे राहणारे लोकनेते श्री.रामशेठ ठाकूर आहेत. भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे या भूमिकेत ते नेहमीच असतात. जे एम म्हात्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रितम म्हात्रे हे अनेक वर्ष सामाजिक काम करत आहेत. त्यामुळे ते अन्य कोणत्या पक्षाचे वाटतच नव्हते तर ते आपलेच वाटत होते असे आ. विक्रांत पाटील यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत तसेच भारतीय जनता पार्टी ही देश प्रेमासाठी काम करणारी पार्टी आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेसाठी असणाऱ्या असंख्य योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन आ. विक्रांत पाटील यांनी केले. 



पक्षप्रवेश 

यावेळी कामोठे येथील अल्पेश माने प्रमुख संघटक शेकाप, सुरेश खरात कामोठे शहर अध्यक्ष व्यापारी सेल, सौ.शुभांगी खरात, यांच्यासोबतच खांदा कॉलनी येथील शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष श्री.जयंत भगत, यांच्यासोबत त्यांच्या संघटनेच्या असंख्य सहकाऱ्यांनी शेकापमधून भाजपमध्ये प्रवेश केला यामुळे कामोठे आणि खांदा कॉलनी येथे श्री.प्रितम म्हात्रे यांच्या प्रवेशानंतर भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली आहे. 




 चौकट

भाजपचे प्रितम म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन असताना देखील ते खुर्चीवर बसले नव्हते. ते बाजूला उभे होते.यावेळी मा.खासदार रामशेठ ठाकूर यांनी काम करणाऱ्याला खुर्चीची गरज नसते असे प्रितम म्हात्रे यांच्याकडे बघून सांगितले

Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)...

पराभूत झाले तरी संपूर्ण ताकदीने लढले

  पनवेल : पनवेल 188 विधानसभेत शेकाप आघाडीची 2019 मध्ये 87000+ मते असताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेलमध्ये मुसंडी मारून महाविकास आघाडी,शेकाप आणि मित्र पक्षांच्या मदतीने शेतकरी कामगार पक्षाचा 1 लाख 32 हजार 840 चा आकडा पार केला.           बाळाराम पाटील यांच्या विरोधात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या सभा घेतल्या. तसेच स्टार प्रचारक प्रचारात उतरवले याविरुद्ध दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कोणताही मोठा नेता किंवा स्टार प्रचारक नसताना महाविकास आघाडी, शेकाप नेत्यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली माजी आमदार बाळाराम पाटील हे प्रचंड ताकतीने लढले आणि त्यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात एक लाख बत्तीस हजार 840 मते मिळवली. त्यामुळे महाविकास आघाडी शेकापची मते पनवेल विधानसभा मतदारसंघात वाढली आहेत. १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही पनवेल मधील काळसेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी सुरू झाली. ८ वाजता टपाल मतदानाची सुरवात झाल्यापासून शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील हे आघाडीवर होते. पह...