Skip to main content

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्ष पदार्पणानिमित्त कीर्तन महोत्सवाची नियोजन आढावा बैठक संपन्न

 


पनवेल (प्रतिनिधी) सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात अग्रगण्य आणि दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ०२ जून रोजी ७४ वा वाढदिवस असून ते अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहेत. त्या अनुषंगाने दिनांक ३१ मे ते ०२ जून पर्यंत पनवेलमध्ये तीन दिवस 'कीर्तन महोत्सव' आयोजित करण्यात आला आहे. मंदिरे बांधणे, मंदिराचे जिर्णोद्धार तसेच दिंडीसाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सढळ हस्ते केली आहे, त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा अध्यात्मिक मोठ्या प्रमाणात उत्सव म्हणून साजरा झाला पाहिजे, यासाठी वारकरी संप्रदायातील व्यक्तींनी पुढाकार घेतला आहे. त्या संदर्भातील नियोजन बैठक आज (दि. २४) खांदा कॉलनी येथे आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आणि वारकरी संप्रदायातील ज्येष्ठांच्या उपस्थितीत पार पडली. 


           या बैठकीस भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, राजेंद्र पाटील, नेरे मंडल अध्यक्ष भूपेंद्र पाटील, कोकण दिंडीचे अध्यक्ष पद्माकर महाराज पाटील, बाळा महाराज भोपी, भोईर महाराज, धाऊ महाराज पाटील, ह. भ. प.. सुरेश पाटील, शंकर महाराज सांगडे, म्हात्रे महाराज, काशिनाथ महाराज पारठे, निवृत्तीबुवा चौधरी, जनार्दन पाटील, ज्ञानेश्वर महाराज शिंदे, वसंतशेठ पाटील, पुंडलिक महाराज फडके, मधुकर भगत, वसंत ढवळे, चंद्रकला जायभाये, सुजाता साबळे, गीताताई पाटील, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, विचुंबे सरपंच प्रमोद भिंगारकर, शिवकर सरपंच आनंद ढवळे, अनेश ढवळे आदी उपस्थित होते. 


       यावेळी आमदार महेश बालदी यांनी सांगितले कि, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सारखा दानशूर आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व जिल्हयात दुसरे झाले नाही. त्यामुळे त्यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस वर्ष संपूर्ण वर्षभर विविध समाजोपयोगी कार्यक्रमाने साजरा करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. अमृत महोत्सवी वर्षाच्या पदार्पण निमित्त अध्यात्मिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, कला अशा क्षेत्रातील विविध उपक्रम राबविण्यात येणार असून कीर्तन महोत्सव हा पहिला अध्यात्मिक कार्यक्रम असणार आहे. यामध्ये संगीत भजन, हरिपाठ, हरी कीर्तन आणि अध्यात्मिक क्षेत्रातील ज्येष्ठांचा सन्मान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मान्सूनपूर्व पाऊस आणि हवामान विभागाच्या सूचना लक्षात हा महोत्सव खांदा कॉलनी मधील सीकेटी महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर निश्चित करण्यात आला असून हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी १३ मुख्य समित्या स्थापन करण्यात आल्याची माहिती आमदार महेश बालदी यांनी यावेळी दिली. तर अनंता महाराज पाटील यांनी या कीर्तन महोत्सवासाची रूपरेषा आपल्या प्रास्ताविकातून दिली. 




कोट-


शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे कार्य अतुलनीय असे आहे. ते अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना वर्षभर विविध समाजोपयोगी कार्यक्रमाची रेलचेल असावी अशी संकल्पना आमदार महेश बालदी यांनी मांडली. त्याची सुरुवात या कीर्तन महोत्सवाने अर्थात विठूरायाच्या नामस्मरणाने होणार आहे. वर्षभर विविध कार्यक्रमे होणारच आहेत त्याबरोबरीने भजन महोत्सवही आयोजित करणार आहोत. विशेष म्हणजे हा कार्यक्रम वारकरी संप्रदायाने आपला स्वतःचा कार्यक्रम समजून हाती घेतला आहे. तुमच्या सर्वांच्या सहभागातून हा महोत्सव मोठा होणार असून या महोत्सवात सहभाग घेत आहात त्याबद्दल ठाकूर कुटुंबाकडून मनस्वी आभार मानतो. - आमदार प्रशांत ठाकूर

Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)...

पराभूत झाले तरी संपूर्ण ताकदीने लढले

  पनवेल : पनवेल 188 विधानसभेत शेकाप आघाडीची 2019 मध्ये 87000+ मते असताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेलमध्ये मुसंडी मारून महाविकास आघाडी,शेकाप आणि मित्र पक्षांच्या मदतीने शेतकरी कामगार पक्षाचा 1 लाख 32 हजार 840 चा आकडा पार केला.           बाळाराम पाटील यांच्या विरोधात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या सभा घेतल्या. तसेच स्टार प्रचारक प्रचारात उतरवले याविरुद्ध दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कोणताही मोठा नेता किंवा स्टार प्रचारक नसताना महाविकास आघाडी, शेकाप नेत्यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली माजी आमदार बाळाराम पाटील हे प्रचंड ताकतीने लढले आणि त्यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात एक लाख बत्तीस हजार 840 मते मिळवली. त्यामुळे महाविकास आघाडी शेकापची मते पनवेल विधानसभा मतदारसंघात वाढली आहेत. १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही पनवेल मधील काळसेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी सुरू झाली. ८ वाजता टपाल मतदानाची सुरवात झाल्यापासून शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील हे आघाडीवर होते. पह...