Skip to main content

प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी आता रस्त्यावरची लढाई लढणार- लोकनेते रामशेठ ठाकूर


कोपरच्या पारंपारिक स्मशानभूमीवर तोडक कारवाई केल्यास जन आंदोलनाचा ईशारा




पनवेल(प्रतिनिधी) सिडकोने कोपर गावातील पारंपारिक स्मशानभूमीवर तोडक कारवाईची टांगती तलवार आणली आहे. मात्र ही केवळ कोपर ग्रामस्थांच्या स्मशानभूमीची समस्या राहिली नसून सिडकोकडून प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सिडको वारंवार भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांवर अन्याय करीत आहे हे खपवून घेतले जाणार नाही. लोकनेते दिबासाहेबांनी कणखर भूमिका घेऊन प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवले. त्यामुळे आता प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढावीच लागेल, असा आक्रमक पवित्रा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी घेतला.

          पनवेल तालुक्यातील कोपर (गव्हाण) येथील शेकडो वर्षांपूर्वीच्या पारंपारिक स्मशानभूमीवर सिडको तोडक कारवाई करणार असल्याचे समजताच या कारवाईला विरोध करण्यासाठी सोमवारी (दि. १९ मे) सकाळी कोपरसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकवटले. यावेळी कारवाईला कडाडून विरोध करताना लोकनेते रामशेठ ठाकूर बोलत होते. यावेळी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी सिडकोसमवेत बैठक लावण्यासंदर्भात उलवे पोलिस ठाण्यावर पायी मोर्चा काढून निवेदनही देण्यात आले. तसेच उरणचे आमदार महेश बालदी आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या असहकार्याच्या भूमिकेबद्दल ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. स्मशानभूमी बाबत ठोस उपाययोजना न केल्यास सिडको, पोलीस स्टेशन, तहसीलदार कार्यालय व वेळप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही ठिय्या मांडू असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी सिडकोविरोधात घोषणा देत स्मशानभूमीच्या कारवाईला आणि स्थलांतरित जागेला तीव्र विरोध दर्शविला. याप्रसंगी पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत, जितेंद्र म्हात्रे, भार्गव ठाकूर, सचिन घरत, रत्नप्रभा घरत, विजय घरत, किशोर पाटील, वामन म्हात्रे, मनोज घरत, साईचरण म्हात्रे, वैभव घरत यांच्यासह कोपर व पंचक्रोशीतील ग्रामस्थ व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

           लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुढे बोलताना सांगितले कि, कोपरची स्मशानभूमी सिडकोने २००६ साली बांधली. २०२० साली स्मशानभूमी भोवती कंपाउंड वॉल बांधण्यासाठी सिडकोने टेंडर काढले आणि आता सिडको स्मशानभूमीवर तोडक कारवाई करू पाहते. त्यामुळे सिडको वारंवार भूमिका बदलत असून प्रकल्पग्रस्तांबाबत दुटप्पी धोरण लादत आहे. येथील वसाहतींना स्मशानभूमीचा त्रास होत असल्याचे सांगत सिडको स्मशानभूमीवर कारवाई करणार असल्याचे सांगते. मात्र याठिकाणी वसाहती नंतर उभ्या राहिल्या असून स्थानिक भूमिपुत्र-प्रकल्पग्रस्तांची स्मशानभूमी परंपरागत अस्तित्वात आहे हे ध्यानात ठेवावे. येथून स्मशानभूमी हटवल्यास गोरगरीब, वयोवृद्ध नागरिकांना अंत्यविधीसाठी अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल याची सिडकोला बिलकुल जाण नाही. 

         ते पुढे म्हणाले, सिडकोने ९५ गावांची जमीन संपादित केली. मात्र अद्यापही या सर्व गावांच्या स्मशानभूमींचा प्रश्न सोडवलेला नाही. त्यामुळे नवीन स्मशानभूमी बांधताना गावातील पारंपारिक जुन्या स्मशानभूमींवर कारवाई करून चालणार नाही. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदर्श सरकार कार्यरत आहे. त्यामुळे सिडकोने नागरिकांवर अन्याय करू नये. प्रकल्पग्रस्तांच्या या समस्येबाबत आमदार महेश बालदी व आमदार प्रशांत ठाकूर या दोघांनीही जातीने लक्ष घालावे, अशीही सूचना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केली.  

         प्रकल्पग्रस्तांवरील अन्याय विरोधात सिडकोविरोधात लढाई पुकारल्यास कल्याण, ठाणे, डोंबिवली, नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त देखील सामिल होतील. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल. आपल्याला आपले हक्क भांडूनच मिळवावे लागतील. सुरुवातीला यासाठी पनवेल व उरण तालुक्यातील प्रकल्पग्रस्त व ग्रामस्थांची मजबूत संघटना गठीत करण्यात येईल. कोपरच्या स्मशानभूमीतून या जनआंदोलनाची ही केवळ ठिणगी पेटली आहे. मात्र प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवायचे असतील तर खऱ्या अर्थाने पेटून उठावे लागेल, असे आवाहनही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी केले.

         यावेळी ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे म्हणाले कि, प्रकल्पग्रस्तांची ही लढाई लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहोत. सिडकोचा उलवे नोड अत्यंत संवेदनशील असून सिडको कोणाच्याही घरावर कारवाई करते, स्थानिकांना सोयीसुविधा देत नाही. त्यामुळे याविरोधात आपली एकजूट महत्वाची आहे. स्मशानभूमीची जमीन वेटलँड क्षेत्रात येत असल्याचे सिडकोचे म्हणणे आहे. परंतु या स्मशानभूमीलगतच्या वेटलँड भूखंडांवर टोलेजंग वसाहती उभ्या राहिल्या आहेत हे सिडकोला दिसत नाही का? या विरोधात आम्ही नक्कीच आंदोलन छेडू. सिडको प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेत नाही, तर हुकूमशाही पद्धतीने कारवाई करते. या हुकूमशाही विरोधात आपण एकजुटीने उभे राहून विरोध करून सडेतोड उत्तर देऊया, असे आवाहनही जे. एम. म्हात्रे यांनी केले. याप्रसंगी ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, माजी सरपंच रत्नप्रभाताई घरत आदींनीही मनोगत व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)...

पराभूत झाले तरी संपूर्ण ताकदीने लढले

  पनवेल : पनवेल 188 विधानसभेत शेकाप आघाडीची 2019 मध्ये 87000+ मते असताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेलमध्ये मुसंडी मारून महाविकास आघाडी,शेकाप आणि मित्र पक्षांच्या मदतीने शेतकरी कामगार पक्षाचा 1 लाख 32 हजार 840 चा आकडा पार केला.           बाळाराम पाटील यांच्या विरोधात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या सभा घेतल्या. तसेच स्टार प्रचारक प्रचारात उतरवले याविरुद्ध दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कोणताही मोठा नेता किंवा स्टार प्रचारक नसताना महाविकास आघाडी, शेकाप नेत्यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली माजी आमदार बाळाराम पाटील हे प्रचंड ताकतीने लढले आणि त्यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात एक लाख बत्तीस हजार 840 मते मिळवली. त्यामुळे महाविकास आघाडी शेकापची मते पनवेल विधानसभा मतदारसंघात वाढली आहेत. १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही पनवेल मधील काळसेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी सुरू झाली. ८ वाजता टपाल मतदानाची सुरवात झाल्यापासून शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील हे आघाडीवर होते. पह...