Skip to main content

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त खांदा कॉलनी येथे महिला मेळावा

 


पनवेल (प्रतिनिधी) चारित्र्यसंपन्न समाज निर्मितीसाठी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना समजून घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश प्रभारी अध्यक्षा वर्षाताई भोसले यांनी खांदा कॉलनी येथे आयोजित महिला मेळाव्यात केले. अखंड परिश्रम, जनसेवेचा वसा आणि न्यायप्रियतेचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने हा विशेष महिला मेळावा आणि भव्य रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. खांदा कॉलनीमधील श्री कृपा हॉल येथे गुरुवारी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

     या मेळाव्याला प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस दीपक बेहरे, चारुशीला घरत, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी पाटील, पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्या रत्नप्रभा घरत, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, महिला मोर्चा सरचिटणीस वृषाली वाघमारे, उपाध्यक्षा प्रिया मुकादम, संध्या शारबिद्रे, माजी नगरसेविका दर्शना भोईर, प्रमिला पाटील, राजश्री वावेकर, प्रिती जॉर्ज, पनवेल शहर मंडळ अध्यक्ष सुमीत झुंझारराव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

         पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची यंदा ३०० वी जयंती साजरी केली जात आहे. या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या वतीने २१ ते ३१ मे या कालावधीत 'सामाजिक पर्व' म्हणून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच अंतर्गत खांदा कॉलनी येथे आयोजित महिला मेळावा आणि रांगोळी स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, गेल्या दहा दिवसांपासून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींचे कर्तृत्व समाजासमोर वेगवेगळ्या माध्यमातून येत आहे आणि महाराणींचे चारित्र्य समजून घेण्याचा योग आपल्याला आला आहे. त्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाची आणि कार्याची माहिती घेतल्यानंतर ती समाजासमोर नेण्याचे काम आपण सर्वानी केले पाहिजे, असे आवाहन केले.

या कार्यक्रमादरम्यान रांगोळी स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. यात हर्षदा फगरे यांनी प्रथम, तनिषा भोईर यांनी द्वितीय तर अंजली खौंड यांनी तृतीय क्रमांक पटकावला. सर्व विजेत्यांना तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन त्यांचा सन्मान

 करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)...

पराभूत झाले तरी संपूर्ण ताकदीने लढले

  पनवेल : पनवेल 188 विधानसभेत शेकाप आघाडीची 2019 मध्ये 87000+ मते असताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेलमध्ये मुसंडी मारून महाविकास आघाडी,शेकाप आणि मित्र पक्षांच्या मदतीने शेतकरी कामगार पक्षाचा 1 लाख 32 हजार 840 चा आकडा पार केला.           बाळाराम पाटील यांच्या विरोधात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या सभा घेतल्या. तसेच स्टार प्रचारक प्रचारात उतरवले याविरुद्ध दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कोणताही मोठा नेता किंवा स्टार प्रचारक नसताना महाविकास आघाडी, शेकाप नेत्यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली माजी आमदार बाळाराम पाटील हे प्रचंड ताकतीने लढले आणि त्यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात एक लाख बत्तीस हजार 840 मते मिळवली. त्यामुळे महाविकास आघाडी शेकापची मते पनवेल विधानसभा मतदारसंघात वाढली आहेत. १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही पनवेल मधील काळसेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी सुरू झाली. ८ वाजता टपाल मतदानाची सुरवात झाल्यापासून शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील हे आघाडीवर होते. पह...