Skip to main content

प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यासाठी घरांचे सर्वेक्षण करण्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश



-रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या  माध्यमातून दोन महिन्यात पनवेल-उरण पट्ट्यात सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्याचे आदेश

-प्रकल्पग्रस्तांची घरे कायम करणार, प्रकल्पग्रस्तांच्या नेत्यांना नगरविकास मंत्र्यांची ग्वाही


पनवेल दि. ०३ (वार्ताहर) :- पनवेल-उरण गावातील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यासाठी या घरांचे रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सर्व्हेक्षण करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी दिले. हे सर्वेक्षण पुढील दोन महिन्यात पूर्ण करून त्यानंतरच या घरांना नियमित करण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेऊ शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


नवी मुंबईतील गरजेपोटी बांधलेली घर नियमित करण्यासाठी त्याचे सूत्र ठरवण्यासाठी २९ गावांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री श्री. शिंदे यांनी दिले होते. त्याच धर्तीवर पनवेल-उरण पट्ट्यातील ५५ गावातील गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यासंदर्भात विशेष बैठक सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. त्यावेळी या प्रकल्पग्रस्तांच्या घरांची निश्चित आकडेवारी शासनाकडे उपलब्ध नसल्याने त्यांचे सर्वेक्षण करण्याची गरज असल्याचे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार पुढील दोन महिन्यात हे सर्वेक्षणाचे काम पूर्ण करून शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश श्री. शिंदे यांनी या बैठकीत दिले.

पनवेल-उरण मधील प्रकल्पग्रस्तांनी नवी मुंबई विमानतळासाठी आपली जमीन दिली असल्याने त्यानी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत शासन सकारात्मक आहे, मात्र त्यासाठी या घरांचे सर्वेक्षण करणे गरजेचे असून त्यानुसार तसे आदेश दिले असल्याचे श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले.


त्यानुसार रायगड जिल्हाधिकाऱ्यांना हे सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून प्रकल्पग्रस्तांनी देखील त्यांनी त्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन श्री शिंदे यांनी प्रकल्पग्रस्तांच्या नेत्यांना या बैठकीत केले. तर शासन जर आमची घरे नियमित करण्यासाठी सकारात्मक असेल तर प्रकल्पग्रस्तही या सर्वेक्षणासाठी शासनाला पूर्ण सहकार्य करतील, अशी ग्वाही प्रकल्पग्रस्तांच्या सर्वपक्षीय नेत्यांनी दिली.


यावेळी रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे, ठाण्याचे खासदार राजन विचारे, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार बाळाराम पाटील,  बबनदादा पाटील अध्यक्ष पनवेल उरण महाविकास आघाडी, मनोहर भोईर माजी आमदार, आर सी घरत जिल्हाध्यक्ष काँग्रेस पनवेल, महेंद्रशेट घरत जिल्हाध्यक्ष रायगड काँग्रेस, शिरीष घरत जिल्हाप्रमुख शिवसेना,  प्रशांत पाटील सचिव प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस, सतीश पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, जे एम म्हात्रे माजी नगराध्यक्ष, प्रीतम म्हात्रे विरोधी पक्षनेते पनवेल, सुदाम पाटील जिल्हा कार्याध्यक्ष, अनिल नाईक जिल्हाध्यक्ष समाजवादी पक्ष, गणेश कडू जिल्हा चिटणीस शेकाप,लीना गरड नगरसेविका, कॅप्टन कलावत उपाध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस यांच्या समवेत मा श्री फाटक साहेब सचिव नगरविकास, भूषण गगराणी सचिव नगरविकास,  सिडको व्यवस्थापकीय संचालक मुखर्जी सहव्यवस्थापकीय  संचालक शिंदे साहेब, गणेश देशमुख आयुक्त पनवेल महानगरपालिका तसेच अनेक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. गरजेपोटी बांधलेली सर्व बांधकामे नियमित करण्यासाठी आज उच्चस्तरीय बैठक पार पडली प्रामुख्याने येणाऱ्या काळामध्ये प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली बांधकामे कायमस्वरूपी नियमित करण्यासाठी तोडगा काढण्यासाठी दोन्ही जिल्हाधिकारी यांना निर्देश देऊन सर्व बांधकामे नियमित करण्याच्या दृष्टीने सर्व्हे लवकरात लवकर करून प्रकल्पग्रस्तांनी केलेली जी बांधकामे आहेत ती हद्द निश्चित करून सरकार लवकरच ती सर्व बांधकामे अधिकृत करून तेथील भूमिपुत्रांना न्याय देण्याच्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलणार आहे.सर्व्हे करण्यासाठी येणाऱ्या अधिकारी यांना सहकार्य करून लवकरात लवकर सर्व्हे करून घेण्यात यावे आणि आपला प्रलंबित प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा आणि सर्व्हे झाल्यानंतर सुद्धा  सिडको कोणतीही तोडक कारवाई करणार नाही असे अभिवचन एकनाथ शिंदे उपस्थित शिष्टमंडळास दिले त्याचप्रमाणे मालमत्ता कर बाबतीत चालू वर्ष पासून कर लावावा व करात आणखी सूट द्यावी ही विनंती महाविकास आघाडीने केल्यानंतर त्यावर देखील लवकरच निर्णय घेण्यात येईल असे मंत्री महोदयांनी संगीतले.प्रास्ताविक करत असताना बबनदादा पाटील यांनी सांगितले की दिवंगत दि बा पाटील साहेब यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचे काम महाविकास  आघाडी करणार आहे तरी गरजेपोटी बांधलेली बांधकामे सर्व नियमित करावी जेणेकरून दिवंगत दि बा पाटील साहेबांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल.

Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

पराभूत झाले तरी संपूर्ण ताकदीने लढले

  पनवेल : पनवेल 188 विधानसभेत शेकाप आघाडीची 2019 मध्ये 87000+ मते असताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेलमध्ये मुसंडी मारून महाविकास आघाडी,शेकाप आणि मित्र पक्षांच्या मदतीने शेतकरी कामगार पक्षाचा 1 लाख 32 हजार 840 चा आकडा पार केला.           बाळाराम पाटील यांच्या विरोधात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या सभा घेतल्या. तसेच स्टार प्रचारक प्रचारात उतरवले याविरुद्ध दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कोणताही मोठा नेता किंवा स्टार प्रचारक नसताना महाविकास आघाडी, शेकाप नेत्यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली माजी आमदार बाळाराम पाटील हे प्रचंड ताकतीने लढले आणि त्यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात एक लाख बत्तीस हजार 840 मते मिळवली. त्यामुळे महाविकास आघाडी शेकापची मते पनवेल विधानसभा मतदारसंघात वाढली आहेत. १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही पनवेल मधील काळसेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी सुरू झाली. ८ वाजता टपाल मतदानाची सुरवात झाल्यापासून शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील हे आघाडीवर होते. पह...

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)...