Skip to main content

दुर्लक्षित घटकांच्या लसीकरणाकडे लक्ष देताना रेडलाईट एरियातील महिलांकरिता विशेष लसीकरण सत्र

 


तुर्भे : कोव्हीडच्या संभाव्य तिस-या लाटेपूर्वी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे याकडे विशेष लक्ष दिले जात असून त्यादृष्टीने नागरिकांना आपल्या घरापासून जवळ सुरक्षितपणे लस घेता यावी याकरिता महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार लसीकरण केंद्रांमध्ये वाढ करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सध्या 76 लसीकरण केंद्रे कार्यान्वित असून लसींच्या उपलब्धतेनुसार 100 हून अधिक लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्याचे नियोजन करून ठेवण्यात आलेले आहे.


      लसीकरणचा वेग वाढविण्यावर लक्ष दिले जात असताना समाजातील दुर्लक्षित घटकांच्या लसीकरणाचीही काळजी घेण्यात येत असून नवी मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेऊन सुरू केलेल्या बेघर, निराधार व्यक्तींच्या लसीकरणाची नोंद राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेली आहे. अशाचप्रकारे दिव्यांग व्यक्ती, डोंगराळ भागात कॉरी क्षेत्रात राहणा-या व्यक्ती यांच्याकरताही महानगरपालिकेने लसीकरणाची विशेष सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.


     त्याचप्रमाणे आज तुर्भे भागातील रेडलाईट एरियामधील महिलांकरिता विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. तेथे लसीकरणाविषयी समुपदेशन करून 78 महिलांचे लसीकरण करण्यात आले. येथे लसीकरण करताना काही महिलांच्या मनात लसीकरणाविषयी गैरसमज असल्याचे आढळून आल्याने त्यांची सभा घेऊन त्यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे व त्यांना कोव्हीड विरोधातील लढ्यातील लसींचे महत्व सांगितले जाणार आहे. त्यानंतर लवकरच त्यांच्याकरिता आणखी लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे.


      लसीकरणापासून समाजातील कोणताही पात्र घटक वंचित राहू नये याची काटेकोर काळजी घेतली जात असून प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाने लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे.


      सध्या लसीचे कमी प्रमाणात डोस उपलब्ध होत असल्याने कोणत्या लसीकरण केंद्रावर किती डोस उपलब्ध आहेत याविषयीची माहिती महानगरपालिका विविध माध्यमांतून आदल्याच दिवशी प्रसिध्द करीत असून लसीकरण केंद्रांवर नागरिकांना त्रास होऊ नये याबाबत दक्षता घेतली जात आहे. काही दिवसातच लसींचे प्रमाण वाढून लसीकरणाला वेग येईल त्या अनुषंगाने नागरिकांनी संपूर्ण सहकार्य करावे आणि लस घेतली असली तरी मास्क, सुरक्षित अंतर, हात स्वच्छ ठेवणे या त्रिसूत्रीचे कोव्हीड अजून संपलेला नाही याचे भान ठेवून पालन करावे असेही आवाहन आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे.


Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

पराभूत झाले तरी संपूर्ण ताकदीने लढले

  पनवेल : पनवेल 188 विधानसभेत शेकाप आघाडीची 2019 मध्ये 87000+ मते असताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेलमध्ये मुसंडी मारून महाविकास आघाडी,शेकाप आणि मित्र पक्षांच्या मदतीने शेतकरी कामगार पक्षाचा 1 लाख 32 हजार 840 चा आकडा पार केला.           बाळाराम पाटील यांच्या विरोधात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या सभा घेतल्या. तसेच स्टार प्रचारक प्रचारात उतरवले याविरुद्ध दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कोणताही मोठा नेता किंवा स्टार प्रचारक नसताना महाविकास आघाडी, शेकाप नेत्यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली माजी आमदार बाळाराम पाटील हे प्रचंड ताकतीने लढले आणि त्यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात एक लाख बत्तीस हजार 840 मते मिळवली. त्यामुळे महाविकास आघाडी शेकापची मते पनवेल विधानसभा मतदारसंघात वाढली आहेत. १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही पनवेल मधील काळसेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी सुरू झाली. ८ वाजता टपाल मतदानाची सुरवात झाल्यापासून शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील हे आघाडीवर होते. पह...

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)...