Skip to main content

अनधिकृत बांधकामांवर प्रभावी अंकुश ठेवण्यासाठी आयुक्त श्री. अभिजीत बांगर घेणार नियमित आढावा

 अपेक्षेप्रमाणे कामगिरी न झाल्यास कारवाईचा इशारा


         विनापरवानगी बांधण्यात येणा-या अनधिकृत बांधकामांमुळे शहराला बकाल स्वरुप प्राप्त होते हे लक्षात घेऊन माफिया वृत्तीने अनधिकृत बांधकामे करणा-यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी दिले. 22 जून रोजी घेतलेल्या अतिक्रमण विभागाच्या आढावा बैठकीमध्ये दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा विभागनिहाय आढावा घेत आयुक्तांनी तक्रार आल्यावर कारवाई करण्याऐवजी विभागातील घडामोडींकडे जागरूकतेने लक्ष देत अशाप्रकारची अनधिकृत बांधकामे सुरु असल्याचे आढळल्यास धडक कारवाई करावी असे निर्देश दिले.

       याबाबत काही तक्रार प्राप्त झाल्यास संबंधीत अधिका-यांना जबाबदार धरण्यात येईल असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, अतिक्रमण विभागाचे उप आयुक्त श्री. अमरिश पटनिगिरे तसेच सर्व विभागांचे अतिक्रमण विभागाचे अभियंते आणि वेबसंवादाव्दारे सर्व विभागांचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी उपस्थित होते.

      यावेळी सादर माहितीनुसार 1 जून पासून महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये 97 अनधिकृत बांधकामांना नोटीसा बजाविण्यात आल्या असून नोटीशींना विहित कालावधीत प्रतिसाद न देणा-या 48 अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आलेली आहे. मागील बैठकीतील सादर केलेली अतिक्रमण विरोधी नोटीसा व कारवाईची आकडेवारी आणि त्यानंतरच्या कालावधीतील कारवाईची आकडेवारी यांचा विभागनिहाय तुलनात्मक आढावा घेताना नाराजी व्यक्त करीत आयुक्तांनी विभागीय क्षेत्रात अधिक जागरुकतेने सर्वेक्षण करण्याचे निर्देश विभाग अधिकारी यांना दिले. अतिक्रमण विभागाच्या अभियंत्यांनी आपल्या क्षेत्रात फिरत राहून अनधिकृत बांधकामाबाबत दक्ष रहावे व नवीन अनधिकृत बांधकामे होणारच नाहीत याची दक्षता घ्यावी तसेच होत असलेल्या बांधकामांवर महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 अन्वये नोटीसा बजावून कायदेशीर कारवाई करावी असे आयुक्तांनी आदेशित केले.

      अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी प्रत्येक विभागामाध्ये स्वतंत्र यंत्रणा असूनही अनधिकृत बांधकामे राजरोसपणे होत असल्याचे, एवढेच नव्हे तर काही ठिकाणी अनधिकृत पध्दतीने बहुमजली इमारती उभारल्या जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत याबद्दल आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

      अनधिकृत बांधकामांवर होणा-या कारवाईमध्ये सातत्य असणे गरजेचे असल्याचे नमूद करीत संपूर्ण यंत्रणेला गृहित धरून किंवा संबंधितांच्या सोयीस्कर दुर्लक्षामुळे जर अनधिकृत बांधकामे फोफावत असतील तर जबाबदारी निश्चित केली जाईल असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

      नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत अनधिकृत बांधकामांच्या ठिकाणी नागरिकांच्या माहितीसाठी जनजागृतीपर फलक ठळकपणे प्रदर्शित करावेत व ते काढून टाकले जाणार नाहीत याकडेही काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले. सिडको व एमआयडीसीच्या जागांवरही अनधिकृत बांधकाम होऊ नये याबाबतही दक्ष राहण्याचे स्पष्ट करण्यात आले.

      अतिक्रमण विरोधी कारवाई सर्वांना समान न्याय या पध्दतीने व्हावी याचे भान ठेवून काम करावे व अशा बांधकामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे आढळल्यास अशा अधिकारी, कर्मचा-यांवर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले.

      रस्ते व पदपथ हे नागरिकांना चालण्यासाठी व रहदारीसाठी असून त्यावर कोणत्याही प्रकारच्या अतिक्रमणामुळे अडथळा चालणार नाही असे स्पष्ट करीत कोरोना प्रतिबंधात्मक आदेशानुसार सायंकाळी 4 नंतर दुकाने बंद होऊन सायंकाळी 5 पासून संचारबंदी लागू होत असल्याने फेरीवाल्यांनाही प्रतिबंध आहे याबाबत दक्ष राहण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले.

      धोकादायक इमारतींची यादी नवी मुंबई महानगरपालिकेने जाहीर केली असून अतिधोकादायक इमारतींव्यतिरिक्तही इतर धोकादायक इमारतींबाबत दक्ष राहण्याचे निर्देश सर्व विभाग अधिकारी यांना देण्यात आले.

      *अनधिकृत बांधकामांमुळे शहराच्या नियोजनबध्द विकासाला बाधा पोहचते तसेच नागरी सुविधांवर ताण पडतो तसेच अशा इमारतींमध्ये पैसे गुंतविणा-या नागरिकांचीही मोठ्या प्रमाणावर आर्थिक हानी होते. त्यादृष्टीने अतिक्रमण विभागाची जबाबदारी मोठी असून तशा प्रकारचे काम झाले पाहिजे व विभागाचे अस्तित्व जाणवले पाहिजे असे स्पष्ट करीत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी अतिक्रमण विभागामार्फत केलेल्या कामकाजाचा नियमित आढावा घेतला जाईल व हलगर्जीपणा आढळल्यास कारवाई केली जाईल असे सूचित केले.



Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

पराभूत झाले तरी संपूर्ण ताकदीने लढले

  पनवेल : पनवेल 188 विधानसभेत शेकाप आघाडीची 2019 मध्ये 87000+ मते असताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेलमध्ये मुसंडी मारून महाविकास आघाडी,शेकाप आणि मित्र पक्षांच्या मदतीने शेतकरी कामगार पक्षाचा 1 लाख 32 हजार 840 चा आकडा पार केला.           बाळाराम पाटील यांच्या विरोधात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या सभा घेतल्या. तसेच स्टार प्रचारक प्रचारात उतरवले याविरुद्ध दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कोणताही मोठा नेता किंवा स्टार प्रचारक नसताना महाविकास आघाडी, शेकाप नेत्यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली माजी आमदार बाळाराम पाटील हे प्रचंड ताकतीने लढले आणि त्यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात एक लाख बत्तीस हजार 840 मते मिळवली. त्यामुळे महाविकास आघाडी शेकापची मते पनवेल विधानसभा मतदारसंघात वाढली आहेत. १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही पनवेल मधील काळसेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी सुरू झाली. ८ वाजता टपाल मतदानाची सुरवात झाल्यापासून शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील हे आघाडीवर होते. पह...

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)...