Skip to main content

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून आपत्कालीन परिस्थितीत सर्वसामान्यांना आधार - केंद्रीय मंत्री रामदास आठवले

पनवेल(प्रतिनिधी) लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याबरोबर मी संसदेत काम केले. ते स्वच्छ अंत:करणाचे व सरळ मनाचे दानशूर नेते आहेत. मी त्यांना दीर्घ आयुरारोग्य चिंतितो, असे सांगून केेंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की, आपत्कालीन परिस्थितीत सामान्य माणूस आणि पत्रकार यांचीही त्यांनी दखल घेतली ही बाब महत्त्वाची आहे. कोरोना देवदूत पुरस्काराचे मानकरी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पत्रकारांसाठी दिलेल्या अन्नधान्याच्या किटचे वाटप करताना ते बोलत होते. मुंबई मराठी पत्रकार संघात या किटचे वितरण करताना राज्यमंत्री आठवले यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सामाजिक कार्याचा मुक्तकंठाने गौरव केला.   समारंभाच्या अध्यक्षस्थानी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे होते. कोरोनाच्या संकटकाळात महाराष्ट्र शासनाने पत्रकारांना वार्‍यावर सोडले असल्याची खंत वाबळे यांनी या वेळी व्यक्त केली. राज्यमंत्री आठवले यांनी पंतप्रधानांकडे पत्रकारांची बाजू मांडावी, असे आवाहन त्यांनी केले. तोच धागा पकडून आठवले म्हणाले की, कोरोना महामारीत अनेक पत्रकारांची वेतन कपात झाली असून बर्‍याच पत्रकारांना नोकर्‍यांना मुकावे लागले. इतर राज्यांत पत्रकारांना सवलती दिल्या जात असताना राज्य सरकार पत्रकारांची दखल का घेत नाही? असा सवाल त्यांनी केला.  पत्रकारांना अशा आपत्कालीन परिस्थितीत सरकारच्या मदतीची गरज असून त्यांना विशेष पॅकेज मिळावे यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आग्रह करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार फ्रंटलाईन वर्कर असून कोरोना काळात जीव धोक्यात घालून ते वृत्तसंकलन करतात. आघाडीवर राहून काम करणार्‍या पत्रकारांनाही सरकारने फ्रंटलाइन वर्करचा दर्जा द्यावा, असे आठवले म्हणाले. या वेळी आठवले यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात काही पत्रकार, कॅमेरामन व छायाचित्रकारांना अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. पत्रकार संघास अन्नधान्याचे किट दिल्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी आभार मानले. या वेळी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुधाकर काश्यप, कार्यवाह विष्णू सोनवणे व संयुक्त कार्यवाह खलिल गिरकर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

पराभूत झाले तरी संपूर्ण ताकदीने लढले

  पनवेल : पनवेल 188 विधानसभेत शेकाप आघाडीची 2019 मध्ये 87000+ मते असताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेलमध्ये मुसंडी मारून महाविकास आघाडी,शेकाप आणि मित्र पक्षांच्या मदतीने शेतकरी कामगार पक्षाचा 1 लाख 32 हजार 840 चा आकडा पार केला.           बाळाराम पाटील यांच्या विरोधात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या सभा घेतल्या. तसेच स्टार प्रचारक प्रचारात उतरवले याविरुद्ध दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कोणताही मोठा नेता किंवा स्टार प्रचारक नसताना महाविकास आघाडी, शेकाप नेत्यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली माजी आमदार बाळाराम पाटील हे प्रचंड ताकतीने लढले आणि त्यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात एक लाख बत्तीस हजार 840 मते मिळवली. त्यामुळे महाविकास आघाडी शेकापची मते पनवेल विधानसभा मतदारसंघात वाढली आहेत. १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही पनवेल मधील काळसेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी सुरू झाली. ८ वाजता टपाल मतदानाची सुरवात झाल्यापासून शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील हे आघाडीवर होते. पह...

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)...