Skip to main content

19 लाख रुपये किमतीचा गुटखा व तंबाखुजन्य पदार्थाचा साठा जफ्त, अन्न-औषध प्रशासनाची कारवाई

पनवेल दि.17 (वार्ताहर)-अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने सोमवारी उलवे सेक्टर-10 मधील शिवाजी नगर गावठाणातील दोन घरांवर छापा मारुन महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला तब्बल 19 लाख 11 हजार रुपये किंमतीचा गुटखा व तंबाखुजन्य पदार्थाचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी गुटख्याचा साठा बाळगणाऱया एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.          उलवे सेक्टर-10 मधील शिवाजी नगर गावठाणातील दोन घरांमध्ये मोठ्या  प्रमाणात प्रतिबंधित असलेला गुटखा व तंबाखुजन्य पदार्थाचा साठा लपवून ठेवण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता विभागाला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन रायगड विभागाचे सह आयुक्त (दक्षता) समाधान पवार, तसेच दक्षता व गुफ्त वार्ता मुख्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी विशे, महाले, घोसलवाड, महिला अधिकारी येवले, तसेच अन्न सुरक्षा अधिकारी सचिन आढाव व त्यांच्या पथकाने उलवे शिवाजी नगर मधील संशयीत असलेल्या दोन्ही घरांवर छापा मारला. यावेळी दोन्ही घरांना टाळे असल्याचे आढळून आल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने सदर घरांचे टाळे तोडून दोन्ही घरांची तपासणी केली. या तपासणीत दोन्ही घरांमध्ये सुगंधित तंबाखुच्या 9 लाख 73 हजार रुपये किंमतीच्या 8 मोठÎा पिशव्या, रजनीगंधा पान मसाल्याचे 1 लाख 43 हजार रुपये किंमतीचे 74 बॉक्स, संजोग पान मसाल्याचे 2 लाख 82 हजार रुपये किंमतीच्या 47 गोण्या, राजनिवास सुगंधित पानमसाल्याचे 1 लाख 62 हजार रुपये किंमतीच्या 27 पिशव्या, विमल पान मसाल्याचे 3 लाख 16 हजार रुपये किंमतीच्या 32 पिशव्या, 17 हजार रुपये किंमतीचा एस-4 जर्दाच्या 10 पिशव्या, त्याचप्रमाणे 16 हजार 500 रुपये किंमतीचा एक्स एल-01 जाफरानी जर्दाच्या 11 पिशव्या असा एकुण 19 लाख 11 हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित असलेला पान मसाला व तंबाखुजन्य पदार्थाचा साठा करुन ठेवण्यात आल्याचे आढळुन आले. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने गुटखा व तंबाखुजन्य पदार्थाचा साठा करुन ठेवण्याबाबत आकाश चौरसिया याच्याकडे विचारणा केली असता, तो व राजु स्वामी हे दोघे गुटखा, पान मसाला व तंबाखुजन्य पदार्थाच्या पीचा व्यवसाय करत असल्याचे तसेच त्यांनी त्यासाठी दोन्ही घर भाडÎाने घेतल्याचे सांगितले. दरम्यान, सुगंधीत तंबाखू, सुगंधीत सुपारी, गुटखा, पानमसाला या सारख्या पदार्थाचे उत्पादन, साठा, वितरण, विक्री व वाहतुक करण्यावर महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली आहे. असे असताना, आकाश चौरसिया व राजु स्वामी यांनी गुटखा, पानमसाला व तंबाखुजन्य पदार्थाचा साठा करुन ठेवल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाने या दोघांविरोधात न्हावा शेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांनी साठा करुन ठेवण्यात आलेला गुटखा व तंबाखुजन्य पदार्थाचा साठा जफ्त केला आहे.

Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

पराभूत झाले तरी संपूर्ण ताकदीने लढले

  पनवेल : पनवेल 188 विधानसभेत शेकाप आघाडीची 2019 मध्ये 87000+ मते असताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेलमध्ये मुसंडी मारून महाविकास आघाडी,शेकाप आणि मित्र पक्षांच्या मदतीने शेतकरी कामगार पक्षाचा 1 लाख 32 हजार 840 चा आकडा पार केला.           बाळाराम पाटील यांच्या विरोधात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या सभा घेतल्या. तसेच स्टार प्रचारक प्रचारात उतरवले याविरुद्ध दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कोणताही मोठा नेता किंवा स्टार प्रचारक नसताना महाविकास आघाडी, शेकाप नेत्यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली माजी आमदार बाळाराम पाटील हे प्रचंड ताकतीने लढले आणि त्यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात एक लाख बत्तीस हजार 840 मते मिळवली. त्यामुळे महाविकास आघाडी शेकापची मते पनवेल विधानसभा मतदारसंघात वाढली आहेत. १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही पनवेल मधील काळसेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी सुरू झाली. ८ वाजता टपाल मतदानाची सुरवात झाल्यापासून शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील हे आघाडीवर होते. पह...

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)...