Skip to main content

नवी मुंबईमध्ये घर बांधू इच्छिणाऱ्यांसाठी शेवटची सुवर्णसंधी- सिडकोतर्फे लहान व मध्यम आकाराचे 182 निवासी भूखंड विक्रीकरिता उपलब्ध

सिडको महामंडळाकडून महासाथीच्या आणि टाळेबंदीच्या काळात बांधकाम क्षेत्रासह सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी सातत्याने भूखंड विक्रीच्या विविध योजना राबविण्यात असून, या योजनांना उत्तम प्रतिसाद लाभत आहे. आता एका नवीन योजनेद्वारे, सिडकोकडून नवी मुंबईच्या ऐरोली, घणसोली, खारघर, कळंबोली आणि पनवेल नोडमधील 182 निवासी भूखंड विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या योजनेमुळे नवी मुंबईसारख्या पायाभूत सुविधांनी परिपूर्ण शहरामध्ये आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची तसेच गुंतवणूकीची शेवटची संधी चालून आली आहे.  "कोविड-19 महासाथ व टाळेबंदीच्या काळात बांधकाम क्षेत्रासह सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणाऱ्या विविध योजना सिडकोने सातत्याने राबविल्या. या नवीन योजनेद्वारे वाजवी दरातील निवासी भूखंड उपलब्ध करून देत, नवी मुंबईमध्ये आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची संधी सिडकोकडून सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे." डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक    सिडकोकडून सातत्याने, नवी मुंबईतील निवासी, वाणिज्यिक, सामाजिक व सांस्कृतिक उद्देशाकरिता असलेले विविध भूखंड विक्रीकरिता उपलब्ध करून दिले जातात. सदर योजने अंतर्गत सिडकोकडून ऐरोली, घणसोली, खारघर, कळंबोली आणि पनवेल नोडमधील मिळून एकूण 182 निवासी भूखंड विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सदर भूखंड हे लहान आकाराचे असून 40 चौ.मी. ते 300 चौ.मी. दरम्यानच्या क्षेत्रफळाचे आहेत. सदर भूखंड हे किफायतशीर दरात उपलब्ध असून निर्वेध मालकी (क्लिअर टायटल) असणाऱ्या या भूखंडांना सिडकोची हमी आहे.  सदर योजना ही ई-निविदा व ई-लिलाव पद्धीतीने पार पडणार असून भूखंडांच्या तपशिलासह वेळापत्रक नमूद असलेली योजना पुस्तिका 22 जून 2021 पासून सिडकोच्या https://eauction.cidcoindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. निविदाकारांची नोंदणी, अर्ज सादर करणे व अनामत रकमेचा भरणा करणे, या प्रक्रिया 22 जून 2021 ते 13 जुलै 2021 या कालावधीत सुरू राहतील. बंद निविदा सादर करण्याची प्रक्रिया 22 जून 2021 ते 14 जुलै 2021 या कालावधीत सुरू राहिल. तर ई-लिलाव प्रक्रिया 15 जुलै 2021 रोजी पार पडणार आहे.      या योजनेमुळे अत्याधुनिक दर्जाच्या पायाभूत, सामाजिक व वाणिज्यिक सुविधा असणाऱ्या नवी मुंबईमध्ये आपले मनपसंत घर साकारण्याचे अनेकांचे स्वप्न साकार होणार आहे. उपनगरीय रेल्वे, महामार्ग व अंतर्गत रस्त्यांचे जाळे, यांमुळे नवी मुंबईला उत्तम संधानता (कनेक्टिव्हिटी) लाभली आहे. नजीकच्या काळात साकार होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे नवी मुंबई थेट जगाला जोडली जाणार आहे. तसेच सिडकोतर्फे साकारण्यात येत असलेल्या मेट्रो प्रकल्पामुळे सार्वजनिक परिवहन सेवा अधिक सक्षम होणार आहे. नियोजित कॉर्पोरेट पार्क प्रकल्पामुळे शहराच्या वाणिज्यिक क्षमता मोठ्या प्रमाणावर वृद्धिंगत होणार आहेत. लहान आकाराच्या भूखंडांमुळे विशेषत:, सर्वसामान्य नागरिकांना नवी मुंबईमध्ये आपले मनपसंत घर साकारण्याची शेवटची संधी या योजनेमुळे उपलब्ध झाली आहे. तरी अधिकाधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिडकोकडून करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

पराभूत झाले तरी संपूर्ण ताकदीने लढले

  पनवेल : पनवेल 188 विधानसभेत शेकाप आघाडीची 2019 मध्ये 87000+ मते असताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेलमध्ये मुसंडी मारून महाविकास आघाडी,शेकाप आणि मित्र पक्षांच्या मदतीने शेतकरी कामगार पक्षाचा 1 लाख 32 हजार 840 चा आकडा पार केला.           बाळाराम पाटील यांच्या विरोधात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या सभा घेतल्या. तसेच स्टार प्रचारक प्रचारात उतरवले याविरुद्ध दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कोणताही मोठा नेता किंवा स्टार प्रचारक नसताना महाविकास आघाडी, शेकाप नेत्यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली माजी आमदार बाळाराम पाटील हे प्रचंड ताकतीने लढले आणि त्यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात एक लाख बत्तीस हजार 840 मते मिळवली. त्यामुळे महाविकास आघाडी शेकापची मते पनवेल विधानसभा मतदारसंघात वाढली आहेत. १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही पनवेल मधील काळसेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी सुरू झाली. ८ वाजता टपाल मतदानाची सुरवात झाल्यापासून शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील हे आघाडीवर होते. पह...

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)...